AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलासादायक! फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली, 22 टक्क्यांच्या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर

गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील निर्यात मंदावली आहे. मात्र दुसरीकडे भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये तब्बल 22.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

दिलासादायक! फेब्रुवारीमध्ये निर्यात वाढली, 22 टक्क्यांच्या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 8:03 AM
Share

गेल्या आठ दिवसांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील निर्यात (Export) मंदावली आहे. मात्र दुसरीकडे भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीमध्ये तब्बल 22.36 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह निर्यात 33.81 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र या काळात वित्तीय तूट देखील वाढली आहे. व्यापारी तूट वाढून 21.19 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. व्यापर आणि वाणिज्य मंत्रालयाकडून बुधवारी याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार आयातीमध्ये देखील 35 टक्क्यांची वाढ झाली असून, फेब्रुवारी महिन्यात आयात 55 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये देखील वाढ झाली आहे. कच्चा तेलाच्या आयातीत 66.56 टक्क्यांची वाढ झाली असून, ती 15 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आयात आणि निर्यातीच्या फरकातून होणाऱ्या तोट्याचे अंतर 13.12 डॉलर इतके होते.

चालू आर्थिक वर्षात निर्यातीत 46 टक्क्यांची वाढ

वाणिज्य मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधित निर्यातील 45.80 टक्क्यांची वाढ होऊन, निर्यात 374.05 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याच्या मागील वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये एकूण निर्यात 256.55 अब्ज डॉलर एवढी झाली होती. चालू आर्थिक वर्षात आयातीमध्ये देखील वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या अकरा महिन्यांच्या कालावधीत आयातीत 59.21 टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण आयात 550.12 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. तसेच चालू वर्षात व्यापारी तोट्यात देखील वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

कोरोना संकट कमी झाल्याचा परिणाम

याबाबत बोलताना भारतीय निर्यात संघटन महासंघ फियोने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पुरवठा साखळी खंडीत झाली. त्याचा परिणाम हा आयात, निर्यातीवर दिसून आला. मात्र यंदा कोरोना संकट कमी झाले, त्यामुळे पुरवठा साखळी सुरुळीत होण्यास मदत झाली. परिणामी निर्यात देखील वाढली.

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात इंधन दरवाढ; पेट्रोलचे भाव नऊ रुपयांनी वाढणार?

7 लाखांचा विमा तोही अगदी मोफत; जाणून घ्या ‘ईडीएलआय’बद्दल

शेअर बाजाराला युद्धाचे ग्रहण, बाजार कधी सावरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली