AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा….

केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सुधारणांतर्गत कुटुंब पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये केली आहे.

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा....
पेन्शन फंड
| Edited By: | Updated on: Feb 13, 2021 | 10:10 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी शुक्रवारी कौटुंबिक पेन्शन (Family Pensions) अडीच पटहून अधिक वाढवलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सुधारणांतर्गत कुटुंब पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये केली आहे. यामुळे मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील लोकांचं जीवनमान सोपं होईल आणि त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षा मिळेल, असा यामागे हेतू आहे. (family pension limit increased upto 125000 per month here is the details)

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती वेतन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) मुलाचा किंवा त्याच्या पालकांचा मृत्यू झाल्यास कुटुंब पेंशनचे दोन हप्ते मागे घेण्यास पात्र असलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण जारी केलं आहे. त्यामध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यामुळे कठीण काळात कुटुंबाला याची मदत होणार आहे.

अडीच पट वाढ

याआधीही ही रक्कम 45 हजार रुपयांपर्यंत होती. ज्यामध्ये आता अडीच पटीनं वाढ करण्यात आली असून याची रक्कम 1.25 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. असं स्पष्टीकरण अनेक मंत्रालयं आणि विभागांकडून प्राप्त झालेल्या संदर्भांच्या आधारे देण्यात आलं आहे.

दोन मुलांना मिळणार पेन्शन

मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1972च्या नियम 54 च्या पोट-नियम (11) नुसार पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना हे नियम लागू होणार आहेत. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या दोन मुलाला कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, देशातील 21,19,316 शेतकर्‍यांचा वृद्धापकाळ मोदी सरकारनं सुरक्षित केलं आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी (farmers pension scheme) पेन्शन योजनेत नोंदणी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांना या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांच्यासाठी ते विनामूल्य आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून या योजनेचा प्रीमियम कापला जाणार नाही. त्याऐवजी सरकारकडून वार्षिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या 6000 रुपयांतून ते पैसे वजा केले जातील. फक्त यासाठी शेतकऱ्याला तसा पर्याय निवडावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. परंतु त्याअंतर्गत 9 ऑगस्टपासूनच नोंदणीला सुरुवात झाली होती. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana) असे त्या योजनेचे नाव आहे. शेतकर्‍यांना समर्पित असलेली सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. यात सामील झालेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळते. (family pension limit increased upto 125000 per month here is the details)

संबंधित बातम्या – 

नोकरी बदलण्यात महिन्याचे अंतर असल्यास मोठा फटका, काय आहे संपूर्ण प्रकरण?

India’s first CNG Tractor: आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये CNG किट बसवता येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Petrol Diesel Price : आज पेट्रोल स्वस्त की महागलं? वाचा तुमच्या शहरातले भाव

(family pension limit increased upto 125000 per month here is the details)

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.