AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : गुंतवणूकदार हवालदिल, शेअर बाजाराला कशामुळे घसरणीला, वेगात असलेल्या गाडीला कोणी लावला ब्रेक?

Share Market : शेअर बाजारात गुंतवणूकदार पुन्हा कशामुळे हवालदिल झाले आहेत, काय आहेत यामागची कारणे..

Share Market : गुंतवणूकदार हवालदिल, शेअर बाजाराला कशामुळे घसरणीला, वेगात असलेल्या गाडीला कोणी लावला ब्रेक?
घसरणीचे कारण कायImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 25, 2022 | 4:57 PM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) सध्या घसरणीला लागला आहे. एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांचे (Investors) प्रचंड नुकसान झाले होते. जुलै महिन्यापर्यंत बाजारात गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) भारतीय बाजाराकडे पाठ करुन उभे ठाकले आहे. त्यांनी गुंतवणुकीचा ओघ आटवल्याने बाजारात तेजीच्या सत्राला उतरण लागली आहे.

सप्टेंबर महिन्यात या परदेशी पाहुण्यांनी केवळ 8,600 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर गेल्या महिन्यात त्यांनी भारतीय शेअर बाजारात 51,000 कोटींची गुंतवणूक केली होती. बाजारातून परदेशी पाहुण्यांचे हे पलायन अनेक कारणांमुळे होत आहे. पण त्याचा फटका भारतीय बाजाराला बसत आहे. बाजारातील घसरणीचा भारतीय शेअरधारकांना आणि नवख्या गुंतवणूकदारांना फटका बसत आहे.

अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली वाढ, मंदीची आशंका, रुपयाची घसरण, रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव यामुळे परदेशी गुंतवणूकदार प्रभावीत झाले आहेत. त्यांनी गुंतवणूक करताना हात आखडता घेतला आहे. जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर ऑगस्ट महिन्यात त्यांनी 51,200 रुपयांची गुंतवणूक केली होती.

1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात अस्थिरता असताना ही 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी बाजार ही मजबूत स्थिती पोहचला. पण त्यानंतर अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवला. बाजारात पुन्हा मंदीची आशंका वाढली. या धाकधुकीमुळे परदेशी पाहुण्यांनी भारतीय बाजारात गुंतवणूक कमी केली.

जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय बाजारात उत्साह परतला होता. पण त्यानंतर मंदीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवणे कमी केले आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सारखे कोसळत आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.