AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani | अदानी समूहामागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा, अडचणीत वाढ, की होईल सूटका

Gautam Adani | गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. या वर्षांत त्यांच्यावर ग्रह रुसले आहेत. हिंडनबर्ग आणि एका अमेरिकन फर्मने अदानी समूहावर गंभीर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा आता अदानी एंटरप्राईजसची चौकशी करत आहेत. मुंबईत अधिकाऱ्यांची टीम कामाला लागली आहे.

Gautam Adani | अदानी समूहामागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा, अडचणीत वाढ, की होईल सूटका
| Updated on: Oct 14, 2023 | 9:27 AM
Share

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 :ब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राईजसची चौकशी करण्यात येत आहे. गौतम अदानी यांच्यावर संकटांची मालिका सुरु आहे. आरोपांची राळ त्यांच्यावर उठली आहे. त्याचा या समूहाला मोठा फटका बसला आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकाला गवसणी घालता घालता गौतम अदानी जे घसरले. ते पुन्हा या यादीत पिछाडीवरच आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गने अदानी समूहाच्या व्यवहारावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून अदानी समूह अस्थिर झाला आहे. आता केंद्र सरकारच्या कंपनीविषयक मंत्रालयाने आरोपांची शहानिशा करण्यासाठी चौकशी सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी मुंबईत डेरे दाखल झाले आहेत. शुक्रवारी अदानी एंटरप्राईजेसने याविषयीची माहिती दिली. मुंबईतील दोन विमानतळांची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी अदानी एंटरप्राईजेसने चालवायला घेतले आहे. ही प्रक्रिया आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पूर्ण झाली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील अंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन पाहण्यासाठी हे अधिग्रहण करण्यात आले होते. मंत्रालयाने 2017-2022 या काळातील महत्वाची माहिती आणि कागदपत्रे मागितली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यास अदानी समूहाने नकार दिला.

काय आहे आरोप

हिंडनबर्ग आणि आणखी एका अमेरिकन शॉर्ट सेलरने अदानी समूहाने कर चोरी, शेअरमध्ये गडबड केल्याचा आरोप केला होता. कुटुंबातील काही सदस्यांच्या परदेशातील संस्थांच्या माध्यमातून घोटाळ्याचा आरोप केला होता. यामध्ये मलेशिया, इंग्लंड येथील फर्मचा उल्लेख करण्यात आला होता.

चौकशीचा ससेमिरा

भारतीय कॉर्पोरेट मंत्रालयाने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अदानी समूहाच्या व्यवहाराच्या चौकशीला सुरुवात केली होती. भारताची बाजार नियामक संस्था सेबीने, अदानी समूहामधील परदेशातील गुंतवणुकीबाबत संशयास्पद उल्लंघनाविषयी चौकशी केली. त्यातील रकाना कोरा असल्याचे न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनलने मे महिन्यात टिप्पणी केली होती.

काय होता आरोप

काही महिन्यांपूर्वी ईडीने याप्रकरणात प्राथमिक तपास पूर्ण केला. त्यात शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून काही जणांना मोठा फायदा झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.  जगातील दिग्गज गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्या ऑर्गेनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) काही महिन्यांपूर्वी अदानी समूहावर गंभीर आरोप लावले आहेत. फर्मच्या दाव्यानुसार, अदानी कुटुंबियांच्या भागीदारांनी शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ‘ऑफ शोर’ म्हणजे Opaque फंडचा वापर केला.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.