AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India will be a superpower : अमेरिकेला मागे टाकत भारत होणार महासत्ता, इतक्या दिवसांत गरिबी काढणार पळ; गौतम अदानी यांचा दावा

India will be a superpower : 2050 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) बाबतीत भारत अमेरिकेला मागे टाकेल, असा विश्वास आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर या 28 वर्षांत भारतातून गरिबीचं (Poverty) नामोनिशाण संपेल असा विश्वासही अदानींना आहे. नुकतेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून भारत […]

India will be a superpower : अमेरिकेला मागे टाकत भारत होणार महासत्ता, इतक्या दिवसांत गरिबी काढणार पळ; गौतम अदानी यांचा दावा
गौतम अदानी Image Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 23, 2022 | 1:25 PM
Share

India will be a superpower : 2050 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) बाबतीत भारत अमेरिकेला मागे टाकेल, असा विश्वास आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर या 28 वर्षांत भारतातून गरिबीचं (Poverty) नामोनिशाण संपेल असा विश्वासही अदानींना आहे. नुकतेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या गौतम अदानी यांनी एका कार्यक्रमात हा विश्वास व्यक्त केला. सध्या भारताच्या जीडीपीचा आकार 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. अदानींचा मुद्दा योग्य ठरला तर 2050 पर्यंत भारताचा जीडीपी आकार 30 ट्रिलियन डॉलरच्या आसपास असेल. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा पुरवठादार कंपनी PwC च्या ”The World in 2050” या अहवालातही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. या अहवालानुसार, 2050 पर्यंत चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीन पाठोपाठ भारताचा (Chaina GDP) क्रमांक राहिल.

PwCचा अहवाल अदानींच्या मुद्द्याशी सहमत

येत्या 28 वर्षांत भारताचा जीडीपी सुमारे 25 ट्रिलियन डॉलरने वाढणार आहे, असा विश्वास अदानी समूहाच्या (Adani Group) अध्यक्षांनी व्यक्त केला. सध्या भारताच्या जीडीपीचा (Indian GDP) आकार 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. सध्या भारताच्या जीडीपीचा आकार 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. अदानींचा मुद्दा योग्य ठरला तर 2050 पर्यंत भारताचा जीडीपी आकार 30 ट्रिलियन डॉलरच्या आसपास असेल. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा पुरवठादार कंपनी PwC च्या ”The World in 2050” या अहवालातही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. या अहवालानुसार, 2050 पर्यंत चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीन पाठोपाठ भारताचा (Chaina GDP) क्रमांक राहिल. अमेरिका थेट (US GDP) पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरणार आहे.

अदानी म्हणाले, “2050 पासून आपण सध्या सुमारे 10,000 दिवस दूर आहोत. या काळात भारताची अर्थव्यवस्था सुमारे 25 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल, असा माझा अंदाज आहे. म्हणजेच 2050 पर्यंत भारताचा जीडीपी दररोज सरासरी 2.5 अब्ज डॉलरने वाढणार आहे. माझा अंदाज असा आहे की, या काळात भारताच्या शेअर बाजाराचे भांडवलही सुमारे 49 ट्रिलियन डॉलरने वाढेल. याचाच अर्थ 2050 पर्यंत भारतीय शेअर बाजारातील ‘भांडवल’ (Market Capital) दररोज सरासरी चार अब्ज डॉलरने वाढेल.

या चार प्रकरणांत भारताला फायदा

गौतम अदानी पुढे म्हणाले की, आगामी काळात भारत पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत आहे. 2022-23 मध्ये भारतात 100 अब्ज डॉलरची विक्रमी थेट परकीय गुंतवणूक येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा एफडीआय (FDI) मिळवणारा देश ठरणार आहे. अदानी यांच्या मते, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, मध्यमवर्गीयांची वाढ, डिजिटल अर्थव्यवस्थेतील गती आणि हवामान स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणे या चार प्रमुख गोष्टींचे भांडवल करण्यासाठी भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे.

इतर बातम्या :

सोन्याची लंका अन्नाला ‘महाग’, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत

RBI कडून सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाखांचा दंड! नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Follow Us
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?