AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव वधारला, तरीही तुफान खरेदी; एकाच दिवसात तब्बल… आकडा वाचून थक्क व्हाल!

Gold Silver Demand : सोने अजूनही प्रतितोळा 1.50 लाख रुपयांच्या वर आहे, तर चांदीची किंमत प्रति किलो 2.50 लाख रुपयांच्या वर आहे. तरीही अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोने-चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव वधारला, तरीही तुफान खरेदी; एकाच दिवसात तब्बल... आकडा वाचून थक्क व्हाल!
Gold Rate Akshya TritiyaImage Credit source: Google
| Updated on: Apr 19, 2026 | 9:54 PM
Share

गेल्या काही काळांपासून सोने-चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. सोने अजूनही प्रतितोळा 1.50 लाख रुपयांच्या वर आहे, तर चांदीची किंमत प्रति किलो 2.50 लाख रुपयांच्या वर आहे. तरीही अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोने-चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विक्रमी दर असूनही खरेदीची पद्धत बदलली असली तरी यंदा अक्षय तृतीयेला सुमारे 20,000 कोटी रुपयांचा व्यापार होण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतात सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. यावर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षात अक्षय तृतीयेला सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या सोने-चांदीची विक्री झाली होती, तर यंदा हा आकडा 20,000 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. एकट्या दिल्लीत सुमारे 6,000 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

सोने खरेदीसाठी शुभ दिवस

खासदार आणि CAT चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी याबाबत सांगितले की, अक्षय तृतीया हा भारतात सोने खरेदीसाठी सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी मौल्यवान धातूंमध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकालीन समृद्धी देते, अशी धारणा आहे. सोने अजूनही खरेदीचे मुख्य आकर्षण आहे, पण वाढत्या किमतींमुळे खरेदीच्या पद्धतीत बदल दिसून येत आहे.

2026 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1 लाख रुपयांच्या आसपास होते. ते आता 1.58 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. चांदीची किंमतही मागील वर्षीच्या 85,000 रुपये प्रति किलोवरून वाढून 2.55 लाख रुपये प्रति किलो झाली आहे. किमतींमधील या वाढीमुळे ग्राहकांच्या वागणुकीत बदल झाला असला तरी मागणी कमी झालेली नाही. लोक आता अधिक विचारपूर्वक आणि मूल्याधारित खरेदी करत आहेत. सध्या ग्राहक हलक्या वजनाचे दागिने, दैनंदिन वापरासाठी योग्य डिझाइन आणि चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांकडे अधिक लक्ष देत आहेत.

किती सोन्याची विक्री?

अखिल भारतीय सराफ आणि सुवर्णकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले की, 16,000 कोटी रुपयांच्या सोने व्यापाराचा अर्थ सध्याच्या दरांनुसार सुमारे 10,000 किलो (10 टन) सोने विक्री असा होतो. हा आकडा देशभरातील अंदाजे 2 ते 4 लाख ज्वेलर्समध्ये विभागला, तर प्रत्येक ज्वेलरकडे सरासरी फक्त 25 ते 50 ग्रॅम सोने विकले जात आहे, जे प्रत्यक्ष प्रमाणातील घट दर्शवते.

दरम्यान किमती वाढल्यामुळे व्यापाराचे मूल्य वाढत आहे, मात्र प्रत्यक्ष खप कमी होत आहे. त्यामुळे यंदा हलक्या दागिन्यांची आणि छोट्या नाण्यांची मागणी वाढली आहे. ज्वेलर्ससाठी स्टॉक व्यवस्थापन ही मोठी आव्हान ठरत असली तरी अक्षय तृतीयेच्या सकारात्मक वातावरणामुळे बाजारात चांगली खरेदी होत आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप