AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-China trade : चीनमधून आयात घटली, निर्यातीत 26 टक्क्यांची वाढ

चीन आणि भारतादरम्यान मोठ्याप्रमाणात व्यापार होतो. (India-China trade) भारत चीनमधून विविध गोष्टींची आयात (Import) करतो. मात्र त्याप्रमाणात निर्यातीचे प्रमाण कमी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या ट्रेंडमध्ये बदल पहायला मिळत आहे.

India-China trade : चीनमधून आयात घटली, निर्यातीत 26 टक्क्यांची वाढ
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 10:16 AM
Share

चीन आणि भारतादरम्यान मोठ्याप्रमाणात व्यापार होतो. (India-China trade) भारत चीनमधून विविध गोष्टींची आयात (Import) करतो. मात्र त्याप्रमाणात निर्यातीचे प्रमाण कमी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या ट्रेंडमध्ये बदल पहायला मिळत आहे. याबाबत वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेमध्ये माहिती दिली आहे. अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020-21 मध्ये चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तुंच्या प्रमाणात 7.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या घसरणीसह आयात 65.21 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ती 2018 -19 मध्ये 70.31 अब्ज डॉलर इतकी होती. आयात कमी झाली असून, निर्यात (India export to china) वाढली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये निर्यात 21.18 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये निर्यात ही 16.75 अब्ज डॉलर इतकी होती. याचाच अर्थ निर्यातीमध्ये तब्बल 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोरोना काळात व्यापारात वाढ

जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात भारत आणि चीन दरम्यानच्या व्यापारात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. 2021 मध्ये भारत आणि चीनमधील व्यापार वाढून 125.6 अब्ज डॉलरवर पोहोचला. पहिल्यांदाच व्यापाराने 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी भारताने चीनकडून 97.5 अब्ज डॉलरची आयात केली तर 28.1 अब्ज डॉलरच्या वस्तूंची चीनला निर्यात केली आहे. भारत, चीन व्यापारामध्ये गेल्या वर्षी व्यापारी तूट 69.4 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.

व्यापारी तूट वाढली

भारत आणि चीनदरम्यान कोरोना काळात व्यापारामध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या काळात आयात सात टक्क्यांनी घटली आहे. तर निर्यातीमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र तरी देखील व्यापारी तूट मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीनदरम्यानच्या एकूण व्यापरी तूट 69.4 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. केवळ चीन सोबतच नव्हे तर अन्य देशांसोबत देखील भारताच्या निर्यातीचे प्रमाण वाढले असून, भारताच्या निर्यातीने चारशे अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

संबंधित बातम्या

इंधनाच्या किमतींमध्ये आज पुन्हा वाढ; पाच दिवसांमध्ये पेट्रोल 3.20 रुपयांनी महाग, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा

Inflation: महागाईचा आणखी एक मोठा झटका; एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...