AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Reliance Infrastructure) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड 'सेबी'ने स्टॉक एक्सचेंजमध्ये (Share Market) कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत सहभागी होण्यास मनाई कोली होती.

अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा
अनिल अंबानी
| Updated on: Mar 26, 2022 | 7:21 AM
Share

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Reliance Infrastructure) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ‘सेबी’ने स्टॉक एक्सचेंजमध्ये (Share Market) कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत सहभागी होण्यास मनाई कोली होती. सेबीच्या या निर्णयानंतर अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. याबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने माहिती देताना म्हटले आहे की अनिल अंबानी यांना ‘सेबी’ने स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये सहभागी होण्यास मनाई कोली होती. त्यामुळे त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांच्यासह अन्य दोन उद्योगपतींवर ही कारवाई करण्यात आली होती. अनिल अंबानी यांनी राजीनामा दिल्यावर आता त्यांच्या जागी शुक्रवारी राहुल सरीन यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप या नियुक्तीवर सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब बाकी आहे.

गौतम अदानी रिलायन्स कॅपिटल खरेदी करणार?

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीवर कर्जाचा बोजा वाढतच आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. रिलायन्स कॅपिटलवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून कंपनीच्या खरेदीसाठी बोली लावण्याची मुदत वाढवण्यात आली होती.

कंपनीवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज

सप्टेंबर 2021 मध्ये रिलायन्स कॅपिटलची वार्षिक सर्वधारण सभा पार पडली होती. या सभेत कंपनीने आपल्या शेअरधारकांना कंपनीवरील कर्जाची माहिती दिली होती. कंपनीवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचा तब्बल 3966 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळे आता या कंपनीच्या विक्रीची नामुष्की ओढावली आहे. रिलायन्स कॅपिटल या कंपनीची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Inflation: महागाईचा आणखी एक मोठा झटका; एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ

Gold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या, चांदीचे भाव

भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....