AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक आघाडीवर आनंदवार्ता, GDP ची घौडदौड सुरुच, चीनच्या तोंडचे पळाले पाणी

Indian Economy | भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा गरुड झेप घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातील तिमाहीने आनंद संचारला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जो अंदाज वर्तावला होता, त्यापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेने मोठा पल्ला गाठला. भारत हा सर्वाधिक वेगाने धावणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. अर्थव्यवस्थेच्या या भरारीने चीनला मोठी धोबीपछाड दिली आहे.

आर्थिक आघाडीवर आनंदवार्ता, GDP ची घौडदौड सुरुच, चीनच्या तोंडचे पळाले पाणी
| Updated on: Dec 01, 2023 | 10:41 AM
Share

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी झेप घेतली आहे. जगभरातील अर्थव्यवस्था मंदीच्या प्रभावाने मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थने नेत्रदीपक कामगिरी बजावली. जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली. या आर्थिक वर्षातील ही सर्वात दमदार कामगिरी ठरली आहे. सकल देशातंर्गत उत्पादनाची (GDP) आकडेवारी गुरुवारी सांख्यिकी विभागाने समोर आणली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द भारतीय रिझर्व्ह बँकेचे अंदाज पण भारतीय अर्थव्यवस्थेने मोडीत काढत आगेकूच केली आहे. केंद्र सरकारचा खर्च, अर्थ क्षेत्रातील दमदार कामगिरी, खाण आणि बांधकाम विभागामुळे हा डोंगर सहज चढता आला. या आकडेवारीने चीनला धोबीपछाड दिली आहे.

अशी झाली वाढ

सकल देशातंर्गत उत्पादन या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 41.74 लाख कोटी रुपये होते. तर गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत (Q2 2022-23) जीडीपी 38.78 लाख कोटी रुपये होते. त्यावेळी जीडीपीची वाढ 6.2 टक्के होता. या तिमाहीत जीडीपीचा वेग 7.6 टक्के आहे. 30 नोव्हेंबर रोजी भारतीय सांख्यिकी विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. त्यातील आकडेवारीने अनेक अर्थतज्ज्ञांना धक्का दिला. जागतिक घडामोडींचा विचार करता हा वेग अचंबित करणारा आहे.

ही घौडदौड वाखण्याजोगी

भारतीय अर्थव्यवस्थेने झेंडे रोवले आहे. या वेगवान वाढीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही घौडदौड वाखण्याजोगी असल्याचे मत त्यांनी मांडले. अशा बिकट परिस्थितीतील या आर्थिक वर्षातील ही दमदार कामगिरी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोशल मीडिया X वर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. या कामगिरीतून भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता आणि ताकद दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

आरबीआयचा अंदाज चुकवला

भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड डोळे दिपवणारी आहे. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीतील प्रगतीविषयीचा अंदाज जोखला होता. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्क्यांचा टप्पा गाठण्याचा दावा केला होता. पण हा दावा पण खोटा ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी मूसंडी मारली. भारतीय रिझर्व्ह बँकेने या आर्थिक वर्षातील पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी 6.5 टक्के तर तिसऱ्या तिमाहीसाठी 6.0 टक्के आणि अंतिम, चौथ्या तिमाहीसाठी 5.7 टक्के विकासाचा अंदाज वर्तवला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.