AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?

सरकारने सांगितले की, सुमारे 12085 कर्मचारी एअर इंडियामध्ये काम करतात. यापैकी 8084 कायम कर्मचारी आणि 4001 कंत्राटी कामगार आहेत. यापैकी 3400 कायम कर्मचारी 2023-24 या आर्थिक वर्षात निवृत्त होतील. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये एकूण 1434 कर्मचारी आहेत. 191 कायम कर्मचारी आहेत. 1156 कंत्राटी कर्मचारी आहेत.

मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?
Air India
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 5:28 PM
Share

नवी दिल्लीः टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18,000 कोटी रुपयांची बोली जिंकली. 4 ऑक्टोबरला टाटा सन्सची बोली मंजूर झाली असून, मंत्र्यांच्या पॅनलने बोलीला मंजुरी दिलीय. आता मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे काय होणार? त्याची नोकरी कायम राहील की कोणत्या प्रकारचे बदल शक्य आहेत? त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधांचे काय?

एअर इंडियामध्ये सध्या किती कर्मचारी आहेत?

सरकारने सांगितले की, सुमारे 12085 कर्मचारी एअर इंडियामध्ये काम करतात. यापैकी 8084 कायम कर्मचारी आणि 4001 कंत्राटी कामगार आहेत. यापैकी 3400 कायम कर्मचारी 2023-24 या आर्थिक वर्षात निवृत्त होतील. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये एकूण 1434 कर्मचारी आहेत. 191 कायम कर्मचारी आहेत. 1156 कंत्राटी कर्मचारी आहेत.

आता कर्मचाऱ्यांचे काय होणार?

एव्हिएशन सेक्रेटरीने पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणाचीही नोकरी जाणार नाही. टाटा सन्स सर्व कर्मचाऱ्यांना एक वर्षासाठी कायम ठेवेल. दुसऱ्या वर्षी टाटा सन्स व्हीआरएस देऊ शकते. सचिव म्हणाले की, सर्व भत्ते अखंड राहतील. ग्रॅच्युइटी देखील वेळेवर दिली जाईल.

घर रिकामे करण्यास सांगितले होते

सप्टेंबरच्या अखेरीस विमान मंत्रालयाने एअर इंडियाच्या अध्यक्षांना औपचारिकरित्या एक पत्र पाठवून सांगितले होते की, 15 दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांना लेखी हमीपत्र सादर करावे लागेल की ते निवासस्थान शांतपणे रिकामे करीत आहेत. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एआयएसएएमने निर्णय घेतला होता की, एअर इंडियाचे कर्मचारी कंपनीच्या निवासी वसाहतींमध्ये निर्गुंतवणुकीनंतर सहा महिने राहू शकतात किंवा जोपर्यंत या मालमत्ता विकल्या जात नाहीत, जी तारीख आधी असेल. एअर इंडियाच्या निवासी वसाहतींमध्ये राहणाऱ्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांना तातडीने रिकामे करण्याची नोटीस दिली जाईल. परंतु जे सेवेत आहेत त्यांना निर्गुंतवणुकीनंतर सहा महिने राहण्याची परवानगी दिली जाईल. निर्धारित वेळेत घर रिकामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे पत्रात म्हटले आहे. त्यांच्याकडून दंड म्हणून बाजारभावानुसार दुप्पट भाडे आकारले जाऊ शकते आणि दिल्ली-मुंबईच्या अशा कर्मचाऱ्यांकडून 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान शुल्क देखील घेतले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब

नवविवाहित जोडप्यांसाठी मॅटर्निटी इन्शुरन्स खूप फायदेशीर, जाणून घ्या

Modi government sells Air India to Tatas, what about employee jobs? How much salary and allowances will you get?

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.