AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक तासाला 20 लोकांना नोकरी, रिलायन्सच्या साम्राज्यात किती कर्मचारी?

रिलायन्स इंडस्ट्री आता जगातील सर्वात मोठी कंपनी बनण्याच्या वाटेवर आहे. आरआयएल ही भारतातील सर्वात व्हॅल्यूएबल लिस्टेड कंपनी आहे. जागतिक स्तरावर पाहिलं तर रिलायन्स जगातील 45 व्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. येत्या काळात या कंपनीला 30 व्या क्रमांकावर आणण्याचं मुकेश अंबानी यांचं स्वप्न आहे.

प्रत्येक तासाला 20 लोकांना नोकरी, रिलायन्सच्या साम्राज्यात किती कर्मचारी?
| Updated on: Aug 30, 2024 | 11:04 AM
Share

रिलायन्स इंडस्ट्रीची काल एजीएम मिटिंग पार पडली. यावेळी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी रिलायन्समधील नोकरकपातीच्या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं. तसेच रिलायन्समध्ये गेल्या आर्थिक वर्षात प्रत्येत तासाला 20 लोकांना नोकरी देण्यात आली असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 6.5 लाख झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपनीत होत असलेल्या नोकरकपातीच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात 1.7 लाख लोकांना आपण रोजगार दिले आहेत. याशिवाय कंपनीत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 6.5 लाखाहून अधिक झाली आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या वार्षिक अहवालात कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात झाल्याचं म्हटलं होतं. त्यावरही मुकेश अंबानी उत्तर दिलं आहे. कर्मचारी संख्या घटण्याचं कारण म्हणजे कर्मचाऱ्यांनी नोकरीचे वेगवेगळे मॉडेल निवडले होते. आम्ही कुणालाही कामावरून कमी केलं नव्हतं, असं अंबानी यांनी म्हटलं आहे.

नोकरसंख्या का कमी होतेय?

रोजगार सृजनची परिस्थिती जागतिक स्तरावर बदलत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा वाढता वापर आहे. तसेच लवचिक व्यापारी धोरणं आहेत. त्यामुळे रिलायन्स केवळ पारंपारिक प्रत्यक्ष रोजगार मॉडेल ऐवजी नवीन प्रोत्साहनावर आधारीत मॉडेल स्वीकारत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घसघशीत कमाई करण्यास मदत मिळते. त्यांच्या उद्ममशील भावना तयार होते. त्यामुळेच प्रत्यक्ष रोजगाराच्या वार्षिक आकड्यांमध्ये थोडी घसरण झाली आहे. मात्र, रिलायन्सने निर्माण केलेल्या रोजगारात वाढ झाली आहे. अंबानी यांनी भारतातील युवांसाठी रोजगार सृजनाला सर्वोच्च राष्ट्रीय प्राथमिकतेचा दर्जा दिला आहे. अनेक एजन्सीने रिलायन्सला भारतातील सर्वश्रेष्ठ नोकरी देणारी कंपनी म्हणून स्थान दिलं आहे. रिलायन्स भारतातील सर्वात मोठ्या जॉब देणाऱ्या कंपनींपैकी एक आहे.

जगातील 30 वी सर्वात मोठी कंपनी

भूतकाळाच्या तुलनेत आपलं भविष्य अधिक पटीने उज्ज्वल आहे. रिलयान्सला ग्लोबल लेव्हलला टॉप 500 कंपन्यांमध्ये सामील होण्यासाठी दोन दशकाचा काळ लागला. येत्या दोन दशकात आपण जगातील टॉप 50 मौल्यवान कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. आपल्या राजकीय संस्कृतीसोबत डीप टेक आणि अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगसह आपण रिलायन्सला जगातील 30 बड्या कंपन्यांमध्ये सामील करणार आहोत, असं मुकेश अंबानी यांनी म्हटलंय.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन