AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारच्या एका निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फायदा, बाजारात 50-80 रुपयांनी विकतोय कांदा, अजून वाढतील का भाव? कांदा ग्राहकांना रडवणार?

Onion Price Hike : केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी किमान किंमत 1,200 डॉलर प्रति टनाहून कमी करत 950 डॉलर प्रति टन केली आहे. कांद्यासंदर्भात पण केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या घडामोडींचा सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होईल?

सरकारच्या एका निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फायदा, बाजारात 50-80 रुपयांनी विकतोय कांदा, अजून वाढतील का भाव? कांदा ग्राहकांना रडवणार?
कांद्याचा भाव वाढणार का?
| Updated on: Sep 14, 2024 | 11:06 AM
Share

केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी शुक्रवारी कांदा आणि बासमती तांदळाच्या किमान निर्यात मूल्यात बदल केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी किमान किंमत 1,200 डॉलर प्रति टनाहून कमी करत 950 डॉलर प्रति टन केली आहे. आगामी हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. हरियाणात बासमती तांदळाचा तर महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा महत्वाचा ठरु शकतो. त्याअगोदरच केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

कांद्यावर किमान निर्यात मूल्य 550 डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आले होते. आता परकीय व्यापार महासंचालनालयाच्या एका अधिसूचनेनंतर हे शुल्क हटविण्यात आले आहे. तर दुसरीकडे बासमती तांदळावरील निर्यातीसाठीचे 950 डॉलर टन हे किमान शुल्क हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी याविषयीची घोषणा केली.

बाजारात काय परिस्थिती?

ग्राहक मंत्रालयानुसार शुक्रवारी देशात कांद्याचा सरासरी भाव 50.83 रुपये प्रति किलोग्रॅम होता. तर मॉडल मूल्य 50 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मंत्रालयानुसार देशात कांद्याचे कमाल मूल्य 83 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. तर किमान मूल्य 28 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. केंद्र सरकारने 5 सप्टेंबर रोजी दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 35 रुपये प्रति किलोग्रॅम दराने काद्यांची किरकोळ बाजारात विक्री सुरू केली आहे.

राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) यांनी त्यांचे स्टोअर आणि मोबाईल व्हॅनद्वारे कांद्याची किरकोळ विक्री सुरू केली आहे. सरकारकडे या घडीला 4.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. येत्या महिन्यात कांदा आणि त्याची किंमत नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यापर्यंत खरीपाचे क्षेत्र 2.9 लाख हेक्टर आहे. तर वर्षभरापूर्वी ते 1.94 लाख हेक्टर होते. तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे 38 लाख कांद्याचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सणासुदीत कांद्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.