AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेपर्यंत कांद्याचा भाव घसरणार…

दिल्लीत कांद्याची किंमत (Onion Price) 60 रुपये किलोवर पोहोचली आहे. इतकंच नाहीतर महागाईच्या या काळात कांदा आता 100 ते 150 रुपये होणार नाहीत अशी भीती ग्राहकांना सतावत आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी, 'या' तारखेपर्यंत कांद्याचा भाव घसरणार...
कांदा
| Edited By: | Updated on: Feb 12, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई : कांद्याने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा आपला रंग दाखवला आहे. दिल्लीत कांद्याची किंमत (Onion Price) 60 रुपये किलोवर पोहोचली आहे. इतकंच नाहीतर महागाईच्या या काळात कांदा आता 100 ते 150 रुपये होणार नाहीत अशी भीती ग्राहकांना सतावत आहे. पण यावेळी असं होणार नाही. कारण, 15 दिवसांतच मार्केटमध्ये नवीन कांदा दाखल होऊ शकतो. खंरतर, देशात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. इथल्या शेतकरी नेत्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. (onion prices will come down after 15 days mandi bhav rate maharashtra)

महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, धुळे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड कांद्याची केली जाते. कांदा लागवडीचे तीन हंगाम आहेत. पहिला खरीप आणि दुसरा व तिसरा रब्बी हंगाम. एकूण उत्पादनापैकी 65% कांदा रब्बी हंगामात पिकवला जातो. म्हणून तिसर्‍या हंगामातील कांदा अजून येणार आहे. तर सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे भाव वाढल्याची माहिती देण्यात येत आहे.

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे (Maharashtra Onion Producer Organization) संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी टीव्ही -9 डिजिटलशी बोलताना, रब्बी हंगामातील कांदा बाजारात येणार असून भावही कमी होतील असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या हवामान ठीक आहे. त्यामुळे अशा हवामानात कांद्यांचं चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं. आवक वाढल्यास दर खाली येईल. सध्या महाराष्ट्रात कांद्याचे सरासरी दर 30 ते 35 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे ग्राहकांनी काळजी न करात पुढील 10 दिवसात दर सामान्य होईल असं सांगण्यात आलं आहे.

का वाढले कांद्याचे दर ?

कांद्याचे भाव वाढण्याचं पहिलं कारण म्हणजे अवकाळी पाऊस. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगामाच्या दुसऱ्या पेरणीचा कांदा शेतातून येत असताना पाऊस पडला. दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7, 8, 9 आणि 10 जानेवारीला मुसळधार पाऊस पडला. यामुळे कांद्याचं तयार पीकही नष्ट झालं. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान अहमद नगरमध्ये सामान्यपेक्षा 2867 टक्के जास्त पाऊस झाला. त्याचप्रमाणे धुळे येथे 1428, नाशिक 722 आणि पुणे इथं सामान्यपेक्षा 4240 टक्के जास्त पाऊस झाला. यामुळे मंडईत कांद्याची आवक झाली. (onion prices will come down after 15 days mandi bhav rate maharashtra)

संबंधित बातम्या – 

Unit Linked Insurance Plan : विमा तर मिळणारच, वर्षभरात किती रुपये गुंतवल्यावर मिळणार 10 पट परतावा

आता स्पर्श न करता काढा एटीएममधून पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

(onion prices will come down after 15 days mandi bhav rate maharashtra)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...