काय सांगता? अग्निवीरांची 4 वर्षानंतरचीही सोय झाली? प्लास्टिक इंजस्ट्रीजकडून रेड कार्पेट! लाखभर ऑफर लेटर तयार ठेवणार!

अग्निपथ योजनेला विरोध होत असला तर उद्योग जगताने अग्निवीरांना चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे जाहीर केलं आहे. मोठ्या कॉर्पोरेट समुह आणि दिग्गज उद्योगपतीनंतर आता प्लास्टिक इंडस्ट्रीने पण अग्निवीरांना नोकरी देण्याचा कबूल केले आहे.

काय सांगता? अग्निवीरांची 4 वर्षानंतरचीही सोय झाली? प्लास्टिक इंजस्ट्रीजकडून रेड कार्पेट! लाखभर ऑफर लेटर तयार ठेवणार!
अग्निवीरांसाठी प्लास्टीक इंडस्ट्री सरसावलीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 6:24 PM

आजपासून सैन्य दलात नव्याने सुरु झालेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. देशाच्या काही भागात तर याविरोधात हिंसक प्रदर्शने झालीत. सरकारी संपत्तीचे आतोनात नुकसान झाले. रेल्वे बोर्डालाच (Railway Board) जवळपास 700 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. चार वर्षांच्या सेवेच्या अटीमुळे तरुणांचा या योजनेला विरोध आहे. चार वर्षानंतर खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले युवक बेरोजगार होतील अशी टिकाकारांची भूमिका आहे. अशाही परिस्थितीत अनेक उद्योजकांनी (Industrialists) आणि मोठ्या कॉर्पोरेट समुहांनी (Corporate Houses)अग्निवीरांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत. त्यांना चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. आता प्लास्टिक इंडस्ट्रीने (Plastic Industries)अग्निवीरांसाठी पुढाकार घेतला असून अग्निवीरांसाठी लाखभर नोक-या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधापेक्षा या योजनेला अनुकूल वातावरण तयार होताना दिसत आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालयाने ही अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केलं आहे. त्यामुळे अग्निवीरांना चार वर्षानंतर अनेक संधी चालून आल्या आहेत.

प्लास्टिक संघटनेने केली घोषणा

प्लास्टिक इंडस्ट्रीची उच्च संस्था प्लास्टइंडिया फाऊंडेशनने(PlstIndia Foundation) बुधवारी अग्निवीरांना नोकरी देण्याविषयीची घोषणा केली. चार वर्षे अग्निपथ योजनेतंर्गत प्रशिक्षण घेतलेल्या एक लाख अग्निवीरांना एकटी प्लास्टिक इंडस्ट्री नोकरी देऊ शकते, असे घोषीत केले आहे. संघटनने अग्निपथ योजनेला समर्थन दिले आहे. सध्या प्लास्टिक उद्योगात 50 हजारांहून अधिक प्रोसेसिंग युनिट कार्यरत आहेत. गेल्या तीन दशकात प्लास्टिकच्या उत्पादनात आणि वापरात कितीतरी पटीने वाढ झाली आहे. परिणामी प्लास्टिक इंडस्ट्री भरधाव पुढे जात आहे. इंडस्ट्रीत तरुण आणि कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे एक लाख अग्निवीरांना नोकरी देण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचे प्लास्ट इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष जिगीश जोशी यांनी सांगितले. देशाची प्लास्टिक इंडस्ट्री यापूर्वीच 40 लाखांहून अधिक लोकांना नोकरी दिल्याचा सांगत या उद्योगामुळे अप्रत्यक्षरित्या 4 कोटी जणांना अप्रत्यक्षरित्या फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

अग्निवीरांना यापूर्वी नोकरी देण्याचे यांनी दिले आश्वासन

यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज(Reliance Industries), टाटा समुह(Tata Group), महिंद्रा समुह(Mahindra Group), आरपीजी एंटरप्राईजेज (RPG Enterprises), बायोकॉन(Biocon),अपोल हॉस्पिटल ग्रुप(Apollo Hospital Group) या सारखे कॉर्पोरेट समुहांनी अग्निपथ योजनेला समर्थनच दिले नाहीतर त्यांच्या समुहात अग्निवीरांना नोकरी देण्याचे आश्वासन ही दिले आहे. यासोबतच इतर अनेक उद्योजकांनी आणि दिग्गजांनी ही या योजनेला आणि सरकारच्या धोरणाला त्यांचा पांठिबा दर्शवला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.