AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post office RD : पोस्टाची भन्नाट योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा आणि 69,002 रुपये मिळवा

आज आम्ही तुम्हाला एका अशा पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिना 990 रुपये जमा करुन 69,002 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता. (Post Office Saving Schemes Recurring Deposit details)

Post office RD : पोस्टाची भन्नाट योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा आणि 69,002 रुपये मिळवा
Post Office
| Updated on: Jun 04, 2021 | 1:10 PM
Share

मुंबई : रिकरिंग डिपॉझिट हा सामान्य लोकांचा पैसा वाचवण्याचा सर्वात जुना पर्याय आहे. या गुंतवणूकीच्या या पद्धतीचा दरमहा थोडीशी रक्कम जमा करुन तुम्ही एक मोठी गुंतवणूक करु शकता, हा याचा सर्वात मोठा फायदा मानल जातो. जर तुम्ही निश्चित कालावधीसाठी अल्प प्रमाणात गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक वाढू शकते. ते तुम्हाला काही वर्षानंतर फायदेशीर ठरु शकते. आज आम्ही तुम्हाला एका अशा पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिना 990 रुपये जमा करुन 69,002 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता. (Post Office Saving Schemes Recurring Deposit details)

पोस्ट ऑफिसमधील रेकरिंग डिपॉझिट या योजनेवर 5.80 टक्के वार्षिक व्याज मिळतो. त्यामुळे जर तुम्ही दर महिना 990 रुपये जमा केले तर 60 महिन्यात तुमची एकूण रक्कम ही 59,400 रुपये इतकी होते. या रक्कमेवर तुम्हाला 9,602 रुपये व्याज मिळतो. यानुसार तुम्हाला 69,002 रुपये मिळतात.

खाते कसे उघडाल?

पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही व्यक्ती सहज तुमचे खाते उघडू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर आवश्यक माहितीसह अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये 7.4 टक्के व्याज मिळतो. त्यासोबतच रेकरिंग डिपॉझिटसह इतर योजनांची माहिती तुम्हाला पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवरही मिळू शकते. पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम नेमकी किती असावी, हे तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर  मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळते.

रिकरिंग डिपॉझिट योजना खास का?

अनेक पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये रिकरिंग डिपॉझिट ही एक लोकप्रिय योजना आहे. कारण यात तुम्हाला व्याजदर चांगला मिळतो. त्यासोबतच कमी पैशात तुम्ही जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता. भारतीय टपाल विभाग देशभरातील 1.5 लाख टपाल कार्यालयांतून विविध प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवतो. त्यातील काही योजनांचाही समावेश असतो. या योजनेद्वारे तुम्हाला योग्य परतावा मिळतो. जर तुम्हाला कमी पैशात काही ठराविक गुंतवणूक करायची असल्यात तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. (Post Office Saving Schemes Recurring Deposit details)

संबंधित बातम्या : 

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

ना पार्ट टाईम जॉब, ना बिझनेस, नोकरीसोबत Second Income Source तयार करण्यासाठी भन्नाट टिप्स

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.