AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वास अन् नफ्याच्या बाबतीत रतन टाटा मुकेश अंबानींच्या पुढे, टाटा समूहाकडून सर्वाधिक परतावा

टाटा समूह कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. अधिकृत वेबसाईटनुसार, त्यात 29 कंपन्या सूचीबद्ध आहेत. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत या कंपन्यांनी 6 लाख कोटींची संपत्ती निर्माण केली, जी सर्वाधिक आहे. टाटा समूहाने या वर्षी आपल्या भागधारकांना 40 टक्के परतावा दिला.

विश्वास अन् नफ्याच्या बाबतीत रतन टाटा मुकेश अंबानींच्या पुढे, टाटा समूहाकडून सर्वाधिक परतावा
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 12:20 PM
Share

नवी दिल्लीः शेअर बाजार उच्च पातळीवर आहे, त्यामुळे सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य लक्षणीय वाढले. या बाजारातील तेजीला रिलायन्स, टाटा समूहाच्या कंपन्यांचे मोठे योगदान आहे. शेअर बाजाराच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीचा केवळ कंपनीलाच फायदा झाला नाही, तर त्याचे भागधारक आणि गुंतवणूकदारही श्रीमंत झालेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, टाटा समूहाने आपल्या भागधारकांना रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा श्रीमंत बनवले.

टाटा समूह कमाईच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. अधिकृत वेबसाईटनुसार, त्यात 29 कंपन्या सूचीबद्ध आहेत. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत या कंपन्यांनी 6 लाख कोटींची संपत्ती निर्माण केली, जी सर्वाधिक आहे. टाटा समूहाने या वर्षी आपल्या भागधारकांना 40 टक्के परतावा दिला. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिलायन्स समूहाच्या 9 कंपन्या सूचीबद्ध आहेत आणि त्यांनी एकूण 4 लाख कोटींचा परतावा दिला. त्याचा परतावा 28 टक्के आहे. या यादीत बजाज ग्रुप तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अदानी ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप आणि लार्सन अँड टुब्रो यांचा क्रमांक लागतो.

टाटा समूह सर्वात मोठा भागधारक

या अहवालात असेही म्हटले आहे की, टाटा समूहाचा व्यवसाय बऱ्यापैकी वैविध्यपूर्ण आहे. त्याचा भागधारक आधारदेखील सर्वात मोठा आहे आणि कंपनीचे 85 लाख भागधारक आहेत. सेन्सेक्सने या वर्षी आतापर्यंत 26 टक्के परतावा दिला. भारतातील टॉप -10 मधील सात व्यावसायिक गटांनी बाजारमूल्याच्या आधारावर चांगली कामगिरी केली. एचडीएफसी ग्रुपने कमी कामगिरी केली. हिरो मोटोकॉर्प, इंडियाबुल्स आणि किशोर बियाणी यांच्या नेतृत्वाखालील फ्युचर ग्रुपने त्यांच्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला. सेन्सेक्सने या वर्षी आतापर्यंत 26 टक्के परतावा दिला.

विश्वासार्हतेच्या दृष्टीने टाटा समूहाच्या जवळ कोणीही नाही

टाटा समूहाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याच्याशी निगडित विश्वास आहे. इक्विटी मास्टरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, टाटा समूहाला विश्वासाच्या बाबतीत 66 टक्के मते मिळाली. यापूर्वी 2013 मध्येही असेच सर्वेक्षण करण्यात आले होते, ज्यात त्याला फक्त 32 टक्के मते मिळाली होती. ट्रस्टच्या बाबतीत, 153 वर्षीय आदित्य बिर्ला ग्रुप दुसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याला फक्त 5 टक्के मते मिळाली. रिलायन्स ग्रुप तिसऱ्या क्रमांकावर होता आणि त्याला फक्त 4.7 टक्के मते मिळाली.

संबंधित बातम्या

चांगली बातमी! रांग न लावता मोबाईल अॅपमधून सहज हिंदीत रेल्वे तिकिटे बुक करता येणार, जाणून घ्या

Ayushman Bharat Scheme: 5 लाखांचे मोफत आरोग्य कवच, कोण घेऊ शकतो फायदा?

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.