AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉटरी जिंकलेल्यांनीच परत केली बीएमसीची घरं; कारण आलं समोर

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण स्वप्नांच्या या शहरात हक्काचं घर घेणं तितकं सोपं नाही. कारण इथल्या घरांच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडल्या आहेत. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं गेल्या वर्षी कमी दरात घरं उपलब्ध करून दिली होती.

| Updated on: Feb 12, 2026 | 11:39 AM
Share
मुंबई महानगरपालिकेनं लोकांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 426 घरांची लॉटरीद्वारे सोडत काढली. ही घरं कमी आणि अत्यंत कमी उत्पन्न गटांसाठी होती. परंतु आता या घरांची लॉटरी जिंकणाऱ्यांनीच फ्लॅट घेण्यास नकार दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेनं लोकांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 426 घरांची लॉटरीद्वारे सोडत काढली. ही घरं कमी आणि अत्यंत कमी उत्पन्न गटांसाठी होती. परंतु आता या घरांची लॉटरी जिंकणाऱ्यांनीच फ्लॅट घेण्यास नकार दिला आहे.

1 / 5
या घरांच्या किंमती खूप जास्त असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण मुंबईत 426 फ्लॅट्ससाठी लॉटरी काढली होती. अर्ज प्रक्रियेनंतर एकूण 373 विजेते घोषित करण्यात आले होते. परंतु त्यापैकी आता 96 विजेत्यांनी त्यांनी लॉटरीद्वारे जिंकलेली घरं रिकामी करून ती महापालिकेला परत केली आहेत.

या घरांच्या किंमती खूप जास्त असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण मुंबईत 426 फ्लॅट्ससाठी लॉटरी काढली होती. अर्ज प्रक्रियेनंतर एकूण 373 विजेते घोषित करण्यात आले होते. परंतु त्यापैकी आता 96 विजेत्यांनी त्यांनी लॉटरीद्वारे जिंकलेली घरं रिकामी करून ती महापालिकेला परत केली आहेत.

2 / 5
बीएमसी लॉटरी विजेत्यांनी भांडुप आणि भायखळ्यातील फ्लॅट्स जास्त किंमतीच्या असल्याचं कारण दिलं आहे. नाकारलेले बहुतांश फ्लॅट्स हे भांडुप आणि भायखळा या परिसरातील आहेत. हे फ्लॅट खूप महाग वाटल्याने अनेक विजेत्यांनी माघार घेतल्याचं कारण अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

बीएमसी लॉटरी विजेत्यांनी भांडुप आणि भायखळ्यातील फ्लॅट्स जास्त किंमतीच्या असल्याचं कारण दिलं आहे. नाकारलेले बहुतांश फ्लॅट्स हे भांडुप आणि भायखळा या परिसरातील आहेत. हे फ्लॅट खूप महाग वाटल्याने अनेक विजेत्यांनी माघार घेतल्याचं कारण अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

3 / 5
महापालिका आता हे परत केलेल फ्लॅट्स वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना देईल. परंतु जर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांनीही घरं घेण्यास नकार दिला तर रिकाम्या फ्लॅट्सची संख्या वाढू शकते.

महापालिका आता हे परत केलेल फ्लॅट्स वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना देईल. परंतु जर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांनीही घरं घेण्यास नकार दिला तर रिकाम्या फ्लॅट्सची संख्या वाढू शकते.

4 / 5
भायखळा इथं कमी उत्पन्न गटासाठी 300 चौरस फूट घरांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दर गोरेगाव पश्चिम इथल्या स्वामी विवेकानंद मार्ग, पिरामल नगर इथं कमी उत्पन्न गटासाठी 282 चौरस फूट घरांची किंमत 59.15 दशलक्ष रुपये आहे.

भायखळा इथं कमी उत्पन्न गटासाठी 300 चौरस फूट घरांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दर गोरेगाव पश्चिम इथल्या स्वामी विवेकानंद मार्ग, पिरामल नगर इथं कमी उत्पन्न गटासाठी 282 चौरस फूट घरांची किंमत 59.15 दशलक्ष रुपये आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.