RBI मोदी सरकारला 1.76 लाख कोटी रुपये देणार, मंदीवर मात होणार?

आरबीआयच्या संचालकीय मंडळाच्या बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर हे पाऊल (RBI Surplus Fund) उचलण्यात आलं. आरबीआयच्या कामकाजासाठीचं भांडवल आणि अधिशेष भांडवल याचं हस्तांतरण यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली होती.

RBI मोदी सरकारला 1.76 लाख कोटी रुपये देणार, मंदीवर मात होणार?
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 10:38 PM

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने केंद्र सरकारला लाभांश आणि अधिशेष (RBI Surplus Fund) यातून 1.76 लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. आरबीआयच्या संचालकीय मंडळाच्या बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर हे पाऊल (RBI Surplus Fund) उचलण्यात आलं. आरबीआयच्या कामकाजासाठीचं भांडवल आणि अधिशेष भांडवल याचं हस्तांतरण यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली होती.

आरबीआयने 1,76,051 कोटी रुपये केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आरबीआयने जाहीर केलं. यापैकी 2018-19 साठी 1,23,414 कोटी रुपये अधिशेष आणि 52,637 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही करण्यात आली. अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली रक्कम आरबीआयच्या आर्थिक भांडवलाशी संबंधित संशोधित नियम (ईसीएफच्या) आधारावर काढण्यात आली आहे.

बिमल जालान समिती

आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील समितीची नियुक्ती गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. आरबीआयच्या वित्त भांडवल योजनेची (ईसीएफ) समीक्षा करण्याची जबाबदारी या समितीवर होती. जगभरात अवलंबल्या जाणाऱ्या विविध पद्धती आरबीआयनेही अवलंबल्या पाहिजेत आणि सरकारला थोडा जास्तीचा निधी द्यायला हवा, असं मत सरकारचं होतं.

आरबीआयकडे जमा भांडवल किती असावं हे निश्चित करण्यासाठी यापूर्वीही विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 1997 मध्ये व्ही सुब्रमण्यम, 2004 मध्ये उषा थोरात आणि 2013 मध्ये वाय. एच. मालेगाम यांच्या नेतृत्त्वातील समितीची नियुक्ती करण्यात आली होती.

अधिशेष सरकारला देण्याचा फायदा

आरबीआयकडून अधिशेष मिळाल्यास केंद्र सरकारला वित्तीय तूट कमी करता येईल, तसेच कल्याणकारी योजनांसाठी पैसा मिळेल. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 3.3 टक्के वित्तीय तुटीचं ध्येय निश्चित केलं होतं, जे 2019-20 च्या केंद्राय अर्थसंकल्पात 3.4 टक्के करण्यात आलं.

केंद्र सरकारने सार्वजनिक कर्ज चुकतं करण्यासाठी आरबीआयने दिलेल्या निधीची मदत होईल. बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढावी यासाठी केंद्र सरकारकडून सरकारी बँकांमध्ये 70 हजार कोटी रुपये जमा करण्याची घोषणा नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती. यामुळे बाजारात 5 लाख कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे.

मंदीचा सामना

सध्या जागतिक मंदी सुरु आहे, ज्याचा फटका भारतालाही बसतोय. पण यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच काही निर्णय जाहीर केले. सरकारकडून गुंतवणूक वाढवण्यावर सध्या भर दिला जातोय, त्यातच आता आरबीआयकडून मिळणाऱ्या निधीमुळे फायदा होण्याची आशा आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.