Independence Day: स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना ‘या’ चुका अजिबात करू नका, काय आहेत नियम? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag Code Of India: 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सकाळी ध्वजारोहण करण्यात येते. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहितेनुसारच ध्वजारोहण आणि इतर प्रक्रिया करावी लागते. काय आहे याविषयीचे नियम?

200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी, निम शासकीय, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या आणि प्रतिष्ठानावर तिरंगा डौलाने फडकतो. पण ध्वजारोहणाचे काही नियम आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहिता ठरलेली आहे. त्यानुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसारच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
काय आहेत याविषयीचे नियम?
राष्ट्रीय ध्वज सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी भारतीय ध्वज संहिता निश्चित आहे. त्या नियमानुसार, ध्वजारोहण आणि इतर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
ध्वजारोहण करताना जाणून घ्या हे नियम
1. तिरंगा नेहमी कापडाचा असावा?
राष्ट्रीय ध्वज हा हाताने कातलेल्या आणि विणलेल्या अथवा मशीनद्वारे तयार केलेले असावा. कापूस, पॉलिस्टर, लोकर, रेशीम अथवा खादीपासून तो तयार केलेला असावा.
2. ध्वजारोहण कधी करावे?
सकाळी ध्वजारोहण करावे. दिवसभर राष्ट्रीय ध्वज फडकावतो येतो. पण याविषयीचे काही नियम आहेत.
3. घरावर तिरंगा फडकवता येतो?
नागरीक, खासगी संस्था आणि शैक्षणिक संस्था संपूर्ण दिवस राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतात. घरावरही राष्ट्रध्वज फडकवता येतो. पण त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. राष्ट्रीय ध्वज हा उंच ठिकाणी आणि स्पष्टपणे उठून दिसेल अशा स्थितीत तो असावा. ही काळजी घेणे आवश्यक आहे.
Our Tiranga is our pride- let’s hoist it with the respect and dignity 🇮🇳
Things you should never do with #Tiranga❌
➣ Never hoist upside down
➣ Never hoist a damaged flag
➣ Never let it touch the ground
➣ Never write on it#HarGharTiranga @MinOfCultureGoI pic.twitter.com/jars9XoVU8
— संसदीय कार्य मंत्रालय M/O Parliamentary Affairs (@mpa_india) August 14, 2026
ध्वजारोहण करताना या चुका टाळाच
एकाच ठिकाणी अनेक ध्वजात राष्ट्रध्वज अजिबात फडकवू नका
ध्वजारोहण करताना जागा स्वच्छ करा. तो स्पष्टपणे उठून दिसेल अशा उंच ठिकाणी असावा
तिरंगा उलटा फडकणार नाही याची काळजी घ्या.
केशरी पट्टी नेहमी सर्वात वरच्या बाजूला तर हिरवी पट्टी खालील दिशेने असावी.
कोणत्याही व्यक्तीला सलामी देता यावी यासाठी तिरंगा खाली झुकवू नका, आणू नका.
तिरंगा जमिनीला, फरशीला आणि अथवा इतर वस्तूला घासत जाईल असे करू नका
फाटलेला, खराब आणि विस्कटलेला तिरंगा अजिबात फटकवू नये
तिरंग्यावर काहीही लिखाण नसावे. त्यावर डाग नसावेत याकडे कटाक्षाने लक्ष द्या
सजावटीसाठी, टेबलावर टाकण्यासाठी तिरंग्याचा अजिबात वापर होऊ नये
तिरंग्याचा वापर कपडे, गणवेश म्हणून बिलकूल, अजिबात करू नका
रुमाल, नॅपकिन, कुशन वा इतर कपड्यांवर तिरंग्याची छपाई करू नये
