AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Repo Rate : पुन्हा ईएमआय वाढला, वाहन-गृह कर्ज महाग, RBI ने तोंडचे पाणी पळवले

Repo Rate : RBI ने रेपो दरात, वर्षातील पाचवी वाढ केल्याने तुमच्या बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे..

Repo Rate : पुन्हा ईएमआय वाढला, वाहन-गृह कर्ज महाग, RBI ने तोंडचे पाणी पळवले
पुन्हा महागाईचा मारImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 07, 2022 | 4:33 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यंदा रेपो दरात पाचव्यांदा वाढ केली. आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 0.35 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांहून 6.25 टक्के होणार आहे. त्याचा मोठा फटका देशातील कर्जदारांना बसणार आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जदारांना ईएमआयपोटी (EMI) जादा रक्कम खर्च करावी लागणार आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakti Kant Das) यांनी बुधवारी पतधोरण समितीच्या अहवालानंतर रेपे दरात वाढीची घोषणा केली.

आरबीआयने मे पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. आतापर्यंत रेपो दर 5.90% वर आला होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. आता रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. हा महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ झाली. तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढेल. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढू शकतो. आरबीआयच्या धोरणामुळे आतापर्यंत व्याजदरात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, देशात महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी सर्व कवायत सुरु आहे. महागाई आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असले तरी पुढील वर्षात महागाई दरात वाढ अपेक्षित आहे.

यासोबतच भारताचे सकल देशातंर्गत उत्पन्नात (GDP) वाढ होण्याची शक्यता आहे. जीडीपी वृद्धी दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी वर्तविला आहे. जागतिक संस्था आणि आर्थिक संस्थांनी मात्र कमी अंदाज वर्तविला आहे.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.