AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retail Inflation: महागाईचे घाबरवणारे आकडे! किरकोळ बाजारातील महागाई गेल्या 17 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर

Retail Inflation: सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढलेला असल्याचं दिसून आलं आहे. या वाढत्या महागाईनं सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे.

Retail Inflation: महागाईचे घाबरवणारे आकडे! किरकोळ बाजारातील महागाई गेल्या 17 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
वाढत्या महागाईत चिंता वाढवणारी बातमीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 12, 2022 | 11:01 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या सतरा महिन्यातील उच्चांकी आकडा महागाईनं (Inflation) गाठलाय. किरकोळ महागाईत वाढ सुरुच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. गेल्या 17 महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा कधीच इतक्या विक्रमी (Highest inflation in last 17 years) स्तरावर पोहोचलेला नव्हता. मार्च महिन्यात किरकोळ महागाई 6.95 वर जाऊन पोहोचली आहे. मार्च महिन्यात झालेली किरकोळ महागाईतली वाढ प्रचंड असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. खाद्यपदार्थांच्या (Food Inflation) वाढलेल्या किंमतींमुळे किरकोळ महागाईचा दर आवाक्यात येणं तर दूरच पण आता हा दर चिंताजनक स्थितीवर जाऊन पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ महागाई ही 6.07 टक्के होता. आता हा दर 6.95 झाला आहे.

मार्चच्या सुरुवातीच्या दिवसांत किरकोळ महागाईचा दर हा 7.68 टक्के इतरा होता. दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीला किरकोळ महागाईचा दर 5.85 टक्क्यांवर होता. दरम्यान, मार्च महिन्यात पेट्रोलसोबतच भाज्यांचे दर आणि खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्यानं दिसून आल्यानं सर्वसामान्यांचं बजेट मोडलंय.

आकडेवारी थोडी सविस्तर…

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा कुठे किती आहे आणि गेल्या महिन्यात किती होता, यावरही एक नजर टाकुयात.

  1. मार्च 2022 किरकोळ महागाई – 6.95 ग्रामीण क्षेत्र – 7.66 शहरी क्षेत्र – 6.12
  2. मार्च 2021 किरकोळ महागाई – 5.52 ग्रामीण क्षेत्र – 4.61 शहरी क्षेत्र – 6.52
  3. फेब्रुवारी 2022 किरकोळ महागाई – 6.07 ग्रामीण क्षेत्र – 6.38 शहरी क्षेत्र – 5.75

वाढीची कारणं…

गेल्या वर्षीच्या तुलेत ग्रामीण भागात महागाई वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. तर दुसरीकडे खाद्यपदार्थांचे दर हे 7.68 टक्क्यांनी वाढले आहेत. ग्रामीण भागातही खाद्य पदार्थांचे दर 8.04 तर शहरी भागात खाद्य पदार्थांचे दर 7.04 टक्क्यांनी वाढले असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

RBI मर्यादेपेक्षा जास्त महागाई

सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढलेला असल्याचं दिसून आलं आहे. या वाढत्या महागाईनं सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे. रिझर्व बँकेनं किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा चार टक्के ठेवण्याचं ध्येस समोर ठेवलं आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात दुधाच्या किंमती, खाद्य पदार्थांच्या किंमती या सगळ्यांवर इंधन दरवाढीचा परिणाम जाणवला आहे.

महागाईचा फटका सगळ्यांना बसताना बघायला मिळतोय. जर किरकोळ बाजारातील महागाईचा दर असात वाढत राहिला तर आरबीआयला कर्जावरील व्याजाचा दरही वाढवावा लागू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या आरबीआयनं घातलेल्या किरकोळ बाजारातील महागाईच्या दरापेक्षा दोन टक्के जास्त महागाई दर असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

पोस्टाच्या MIS, SCSS आणि मुदत ठेवीला ताबडतोब करा बँक खात्याशी लिंक करा; अन्यथा अडकरणार व्याजाची रक्कम!

‘आरबीआय’ नियंत्रित बाजाराची वेळ बदलली ; सोमवार पासून सकाळी ‘नऊ’ ला सुरू होईल कामकाज

मेहनत आणि इमानदारीचे फळ; चेन्नईमधील आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कारची भेट

पाहा व्हिडीओ :

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.