AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-Ukraine war, बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; महागाई भडकण्याची शक्यता

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia-Ukraine war)  सुरू आहे. रशियाने युक्रेनवर (Ukraine) बॉम्ब हल्ले केले, मात्र त्याचा आवाज जागतिक शेअर बाजारात (stock market) ऐकायला मिळाला. शेअर बाजाराप्रमाणेच जागतिक बाजारपेठेला युद्धाचा मोठा फटका बसला आहे.

Russia-Ukraine war, बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; महागाई भडकण्याची शक्यता
भारतात महागाईचा भडका उडणार
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 8:16 AM
Share

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia-Ukraine war)  सुरू आहे. रशियाने युक्रेनवर (Ukraine) बॉम्ब हल्ले केले, मात्र त्याचा आवाज जागतिक शेअर बाजारात (stock market) ऐकायला मिळाला. युद्धामुळे शेअर बाजारामध्ये नकारात्मक वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. चीन, जपान, तैवान, भारतासह अशिया खंडातील जवळपास सर्वच शेअर बाजार कोसळले आहेत. गुरुवारी शेअर बाजार सुरू होताच शेअर बाजारात तब्बल तीन टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. शेअर बाजार सातत्याने घसरत असल्याने गुंतवणूकदारांचे गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांना तब्बल दहा लाख कोटींचा फटका बसला आहे. 2020 नंतर प्रथमच शेअर बाजारात एवढी घसरण पहायला मिळाली. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच युद्धामुळे अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याने शेअर विक्रीचा दबाव वाढला आहे. याबाबत बोलताना एस सिक्योरिटीजचे इक्विटी हेड अमर अंबानी यांनी म्हटले आहे की,. युद्ध कोणतेही असो, युद्धानंतर बाजारात तेजी येते. मात्र युद्धादरम्यान मंदीचे सावट असते. मग तो व्हियेतनामचा तणाव असूद्यात की अफगानिस्तानमधील तालीबान्याचे बंड प्रत्येकवेळी हीच स्थिती पहायला मिळाली.

पेट्रोल, डिझेलमध्ये दरवाढ

रशिया ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळेच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होताच कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचल्या आहेत. येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. कच्च्या तेलाचे दर अचानक वाढल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

धातूच्या किमती वाढणार

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा धातूंच्या किमतीवर देखील होताना दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. भारतामध्ये सोन्याचे दर प्रती तोळा 51000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदी 66000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात मौल्यवान धातुच्या कीमती आणखी वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

संबंधित बातम्या

रशिया – युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच

कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, भारताला अद्याप झळ कायम; देशांतर्गत अर्थव्यवस्थेला फटका

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.