AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने सांगितली या 3 बँकांची नावे

Safest Bank in India : तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे बँकेत पैसे असतील. मात्र अनेकांना नेहमी भीती असते की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाहीत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे.

देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने सांगितली या 3 बँकांची नावे
safest bank of India
| Updated on: Dec 03, 2025 | 10:50 PM
Share

भारतात अनेक बँका आहेत, यातील काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे बँकेत पैसे असतील. मात्र अनेकांना नेहमी भीती असते की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाहीत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे. या बँकांमध्ये तुमचे पैसे असले तर तुम्हाला कोणताही धोका नाही. या बँका कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँकांची नावे जाहीर केली आहेत. बँकिंग भाषेत या बँकाना “डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स” (D-SIBs) म्हणतात. या तीन बँका भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या बुडणार नाहीत किंवा दिवाळखोर होणार नाहीत असं आरबीआयने म्हटलं आहे. कारण या बँका इतक्या मोठ्या आहेत की बँका बुडाल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.

या तीन बँका महत्त्वाच्या का आहेत?

तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की, सरकारी बँका या सर्वात सुरक्षित असतात, मात्र आरबीआयच्या यादीत 3 पैकी दोन बँका या खाजगी क्षेत्रातील आहेत. या तिन्ही बँकांचे देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. छोटीशी चूक झाली तरीही याचा परिणाम शेअर बाजारापासून सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे आरबीआय आणि भारत सरकारने या भविष्यात या बँकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुमचे पैसे या 3 बँकांमध्ये असतील तर ते पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, या तिन्ही बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त रोख राखीव निधी किंवा भांडवल जवळ ठेवावे लागते. याला ‘कॉमन इक्विटी टियर 1’ (CET 1) असे म्हणतात. हा आपत्कालीन निधी आहे जो संकटाच्या वेळी वापरता येतो. त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर परिणाम होत नाही किंवा नागरिकांच्या पैशांवर गदा येत नाही. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे असणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी
सरकार आलं पण 1 वरून 2 नंबर झाले, शिंदेंवरून सभागृहात जोरदार टोलेबाजी.
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी
'एक नंबर'वरून आर.आर पाटलांचा भाषण चर्चेत अन् जयंत पाटलांचीही टोलेबाजी.