China : चीनच्या आर्थिक विकासातील मंदीमुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राची चांदी; गुंतवणूक वाढीची शक्यता

मूडीजने चीनच्या 2022 च्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. ताज्या अहवालानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 3.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे.

China : चीनच्या आर्थिक विकासातील मंदीमुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राची चांदी; गुंतवणूक वाढीची शक्यता
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 11:47 AM

नवी दिल्ली : देशांतर्गत आणि जागतिक कारणांमुळे चीनमधील (China slowdown) आर्थिक विकासातील मंदी ही भारताच्या उत्पादन (Indian Manufacturing) क्षेत्रासाठी एक संधी आहे. आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे. ही चिन्हे लक्षात घेता, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि पर्यायी जागतिक पुरवठा केंद्र म्हणून उदय होण्यासाठी भारताला आपले उत्पादन क्षेत्र मजबूत करणे, आवश्यक आहे असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात (Real Estate Sector) सुरू असलेल्या समस्या आणि कोव्हिडची साथ रोखण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चीनचा आर्थिक विकास दर यंदा 3.5 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय तैवानवरून अमेरीका आणि चीनमध्ये वाढता तणाव पाहता आतंरराष्ट्रीय राजकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तैवानचा मुद्दा येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता आणेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील कच्चा माल आणि उपकरणांच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

काय आहे तज्ज्ञाचं मत ?

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुजान हाजरा म्हणाले की, चीनमधील मंदीच्या चिन्हांमुळे भारतासाठी काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील. पहिली गोष्ट म्हणजे, चीनमधील अनिश्चिततेमुळे, पर्यायी जागतिक पुरवठा केंद्र म्हणून भारत हा आकर्षक पर्याय ठरू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे, जागतिक गुंतवणूकदारांच्या उदयोन्मुख बाजारपेठांना जो निधी वितरीत करण्यात येतो, त्यामध्ये भारताचा वाटा वाढू शकतो, असे हाजरा यांनी सांगितले. तर इनक्रेज पीएमएसचे पोर्टफोलिओ मॅनेजर आदित्य सूद यांच्या मतानुसार, चीनमधील मंदीमुळे भारताला जागतिक मूल्य साखळीतील आपला वाटा वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) योजनेसह विविध पाऊले उचलल्यास वस्तूंच्या निर्यातीला आणखी चालना मिळण्यास महत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

कोरोनाचा फटका

जागतिक रेटिंग एजन्सी असणाऱ्या ‘मूडीज’ने 2022 सालातील चीनच्या आर्थिक विकास दर कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ताज्या अहवालानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास दर 3.5 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. यापूर्वी अर्थव्यवस्थेची वाढ 4.5 टक्के दराने होणं अपेक्षित होतं. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू असलेल्या समस्या आणि कोव्हिडची साथ रोखण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आलेले लॉकडाऊन या गोष्टी विकास मंदावण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. देशातील रिअल इस्टेट सेक्टरमधील कंपन्यांवर कर्जाचे खूप ओझे आहे. ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो. तर दुसरीकडे चीनमधील सरकार झिरो कोव्हिड पॉलिसीवर काम करत असून त्यामुळेही आर्थिक विकास मंदावला आहे. त्याचबरोबर चीन सध्या भीषण वीज संकटाशीही लढा देत आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.