.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात मित्रांनी फक्त 10 हजार रूपयांत सुरू केली हाेती ‘ही’ कंपनी, आज आहे 1.32 लाखांचे बाजार मूल्य

1981 ची गोष्ट आहे, जेव्हा बंगळुरूमध्ये एकत्र काम करणाऱ्या 7 तरुण अभियंत्यांनी 10 हजार रुपयांच्या निधीतून ही कंपनी सुरू केली.

सात मित्रांनी फक्त 10 हजार रूपयांत सुरू केली हाेती 'ही' कंपनी, आज आहे 1.32 लाखांचे बाजार मूल्य
आयटी कंपनीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 25, 2022 | 3:27 PM
Share

मुंबई,  कुठल्याही माेठ्या प्रवासाची सुरूवात ही पहिल्या पाऊलापासूनच हाेते. औद्याेगिक क्षेत्रात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांची सुरूवात अत्यंत साध्या आणि प्रतिकूल परिस्थीतीत झाली आहे, मात्र आज त्या अर्थव्यवस्थेचा कणा बनल्या आहेत. अशीच एक कंपनी जी 7 मित्रांनी  फक्त 10 हजार रुपयांमध्ये  सुरू केली ज्याचे आजच्या तारखेत बाजार मुल्य तब्बल 1.32 लाख कोटी आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस (Story Of Infosys), जी सुमारे चार दशकांपूर्वी सुरू झाली होती आणि तेव्हापासून कंपनीने अनेक टप्पे गाठले आहेत आणि आज ती देशातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे.

कशी झाली सुरूवात?

1981 ची गोष्ट आहे, जेव्हा बंगळुरूमध्ये एकत्र काम करणाऱ्या 7 तरुण अभियंत्यांनी 10 हजार रुपयांच्या निधीतून इन्फोसिस सुरू केली. हे सर्व सहकारी पटनी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काम करायचे आणि त्यांनी आयटी सर्वीस प्राेव्हाडर म्हणून या कंपनीचा पाया घातला. त्याच्या संस्थापकांमध्ये एनआर नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, एनएस राघवन, एस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोरा यांचा समावेश होता.

नारायण मूर्ती यांनी पत्नीकडून कर्ज घेऊन सुरू केली कंपनी

इन्फोसिसच्या मुख्य संस्थापकांपैकी एक असलेल्या एनआर नारायण मूर्ती यांनी कंपनी सुरू करण्यासाठी पत्नी सुधा यांच्याकडून पैसे घेतले होते. अत्यंत मर्यादित संसाधनांसह सुरू झालेली ही कंपनी हळूहळू देशातील सर्वात यशस्वी IT कंपन्यांपैकी एक बनली. Patni Computer नावाची कंपनी, ज्यामध्ये तिचे संस्थापक काम करत होते, ती नंतर iGate Corp ने विकत घेतली आणि 2011 मध्ये Capgemini ने ती विकत घेतली.

दुसरीकडे, अननुभवी इन्फोसिस वर्षानुवर्षे यशाच्या पायऱ्या चढत राहिली. 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीचे बाजार भांडवल $16.3 अब्ज (सुमारे 1.32 लाख कोटी रुपये) वर पोहोचले, तर कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3.14 लाख झाली आहे.

जीडीपीमध्ये आयटी क्षेत्राचा 9 टक्के वाटा

आयटी उद्योगातील कंपनीला चार दशके पूर्ण झाल्याच्या आनंदात तिचे सह-संस्थापक आणि सीईओ सलील पारेख यांनी बुधवारी आयटी क्षेत्रातील भविष्यातील रणनीतींवर विचारमंथन केले. गेल्या आर्थिक वर्षात, भारताच्या IT क्षेत्राने GDP मध्ये 9 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे आणि देशाच्या एकूण सेवा निर्यातीत या क्षेत्राचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा