नवी दिल्ली : राज्यातून मोठे उद्योग (Big Industries) गुजरातला पळविण्यात येत असल्याचा मुद्या विरोधकांनी उचलून धरला आहे. राज्यात त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत घमासान सुरु असतानच मराठवाड्यासाठी (Marathwada)आणखी एक चांगली बातमी येऊन धडकली आहे. लातूरमध्ये रेल्वे कोच (Latur Rail Coach) तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला असतानाच आता औरंगाबाद (Aurangabad) ही रेल्वेच्या नकाशावर आले आहे.