AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या वर्षांचा पहिला झटका, १ जानेवारीपासून ही बँक खाती बंद होणार, RBI चा मोठा फैसला

वर्षाचा पहिला दिवस बँक ग्राहकांसाठी महत्वाचा आहे. तीन प्रकारची बँक खाती बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने घेतला आहे. या बँक खात्यात तुमचे खाते तर नाही ना याची माहिती घ्या...

नव्या वर्षांचा पहिला झटका, १ जानेवारीपासून ही बँक खाती बंद होणार, RBI चा मोठा फैसला
बजेट 2025 सादर झाल्यानंतर मध्यमवर्ग आनंदून गेला आहे. 12 लाखांची कमाई करमु्क्त झाल्याचे निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले. त्यामुळे मध्यमवर्गाच्या खिशावरील ताण कमी होईल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सुद्धा या वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.
| Updated on: Dec 31, 2024 | 8:08 PM
Share

नवीन साल २०२५ पासून भारतीय रिझर्व्ह बँक ( RBI ) बँकींग सिस्टीममध्ये बँकींग सिस्टीममध्ये नवीन बदल करण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे.आरबीआयच्या निर्देशानुसार नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार आहेत. त्यामुळे तुमचे खाते यात समाविष्ट नाही ना ? चला पाहूयात..

यामुळे घेतला निर्णय

आरबीआयने फसवणूकीच्या प्रकारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बँकींग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी, डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यात ज्या बँक खात्यात गेल्या १२ महिन्यात कोणताही व्यवहार झालेला नाही, म्हणजे बँक खात्यात १२ महिन्यांपासून जी खाती बंद आहेत ती बँक खाती बंद केली जाणार आहेत.

इनएक्टीव्ह अकाऊंट

जी बँक खाती गेल्या १२ महिन्यांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले त्या खात्यांनी इनएक्टीव्ह कॅटगरीत टाकले जाणार आहे. जर कोणत्या खातेधारकाने एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ आपल्या बँक खात्यात कोणताही व्यवहार केलेला नाही तर अशा स्थिती या खात्यांना इनएक्टीव्ह कॅटगरीत टाकत बंद केले जाणार आहे. तुम्ही हवे तर नंतर बँकेशी संपर्क करुन आपले खाते पुन्हा एक्टीव्ह करु शकता. या निर्णय घोटाळे रोखण्यासाठी घेतला आहे.

झिरो बॅलन्स खाते

ज्या बँक खात्यात खूप काळापासून शून्य बॅलन्स आहेत त्या खात्यांना देखील १ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. अशा खात्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाचा हेतू ग्राहकांना आपल्या खात्याचा वारंवार वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा देखील आहे. जर तुमच्या खाते बराच काळ शून्य बॅलन्स आहे तर तुम्ही लागलीच तुमच्या नजीकच्या शाखेत जाऊन केवायसी करुन घ्यावे.

डोरमेट खाते

हे एक असे खाते आहे.ज्या दोन किंवा अधिक वर्षांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले नाही. अशी खाती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर असतात. अशी खाती हॅक केली जातात. आणि त्याचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जातो.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.