AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayana Murthy : जणू फिल्मी लव्ह स्टोरीच! पुण्याने फुलवली Infosys चे नारायण मूर्ती यांची अनोखी प्रेमी कहाणी..

Narayana Murthy : इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहचरणी सुधा मूर्ती यांच्या प्रेम विवाहाची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभणारी आहे. आयुष्यात अनेक चढउतार आल्यावरही या दोघांची एकमेकांना अजूनही साथ आहे.

Narayana Murthy : जणू फिल्मी लव्ह स्टोरीच! पुण्याने फुलवली Infosys चे नारायण मूर्ती यांची अनोखी प्रेमी कहाणी..
| Updated on: Feb 25, 2023 | 10:56 AM
Share

नवी दिल्ली : भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिस आणि तिचे मालक नारायण मूर्ती (Narayana Murthy), आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना कोण ओळखत नाही. नारायण मूर्ती यांना पाहुन तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही की हा एवढा कामात गर्क माणूस या प्रेमाच्या वाटेवर कसा चालला. तर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे प्रेम फुलले ते आपल्या पुण्यात. त्यांची प्रेम विवाहाची गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभणारी आहे. इन्फोसिस (Infosys) आज देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. या कंपनीचा स्थापना 1981 मध्ये एन आर नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा अभियंत्यांनी अगदी कमी संसाधनात केली होती. गेल्या चार दशकात या कंपनीने आयटी क्षेत्रात मोठा दबदबा तयार केला आहे.

सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांची प्रेम कहाणी पुण्यातील टाटा इंजिनिअरिंग आणि लोकमोटिव्ह कंपनी अर्थात टेल्को (TELCO) या कंपनीत फुलली. दोघेही सोबत काम करत होते. एका मित्राच्या घरी त्यांची ओळख झाली.दोघांमध्ये मैत्री फुलली. पुढे प्रेम खुलले आणि दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय पक्का केला.

” माझी उंची 5 फुट 4 इंच आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मी जीवनात कधी श्रीमंत होईल की नाही, माहिती नाही. तू कुशाग्र आणि हुशार आहेस, माझ्याशी लग्न करशील का?” अशा फिल्मी स्टाईलने सुधा मूर्ती यांना नारायण मूर्ती यांनी प्रेमाची साद घातली होती. गंमत म्हणजे, दोघेही जेव्हा भेटायचे. तेव्हा बिल सुधा मूर्ती भरायच्या. त्यावेळी नारायण मूर्ती यांच्याकडे पैसे नसायचे.

नारायण मूर्ती यांचा तोकडा पगार हा सुधा मूर्ती यांच्या वडिलांसाठी चिंतेचा विषय होता. त्यांची याच कारणामुळे या नात्यावर नाराजी होती. परंतु, प्रेम अतूट असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत जुळतेच. काही दिवसांनी सुधा मूर्ती यांच्या वडिलांनी लग्नाला होकार भरला. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत 10 फेब्रुवारी 1978 रोजी बेंगळुरु येथे दोघेही लग्न बेडीत अडकले.

इन्फोसिसच्या स्थापनेत सुधा मूर्ती यांचा मोठा आर्थिक हातभार आहे. त्यांच्या बचतीतून या कंपनीचा पाया ठेवण्यात आला. त्यांनी कंपनी स्थापण्यावेळी 10 हजार रुपये दिले होते. नारायण मूर्ती यांच्याकडे तर साधे ऑफिसचे भाडे भरण्याइतकाही पैसा नव्हता. ही कंपनी सुरु झाल्याच्या 6 महिन्यानंतर 2 जुलै, 1981 रोजी इन्फोसिस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी झाली. मूर्ती यांच्या घराच्या पुढील भागात इन्फोसिसचे कार्यालय सुरु झाले.

1981 मध्ये नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोडा यांनी पटनी कम्प्यूटर सोडले आणि त्यांनी इन्फोसिस कन्सल्टेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात केली. त्यांना 1983 मध्ये न्यूयॉर्क कंपनीकडून डेटा बेसिक कॉर्पोरेशनकडून पहिली ऑर्डर मिळाली होती. आज या कंपनीत 50 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. 12 हून अधिक देशात इन्फोसिसचे जाळे पसरले आहे.

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.