AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance Scheme : मोदी सरकारची विमा खेळी! निवडणुकीपूर्वी ग्रामीण भागात होईल धमाका

Insurance Scheme : मोदी सरकार इलेक्शन कार्ड खेळणार आहे. ग्रामीण भागात विमा पोहचविण्याचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. काय आहे ही योजना

Insurance Scheme : मोदी सरकारची विमा खेळी! निवडणुकीपूर्वी ग्रामीण भागात होईल धमाका
| Updated on: Apr 02, 2023 | 9:58 PM
Share

नवी दिल्ली : पुढील वर्षात देशात सार्वत्रिक निवडणुका (Lok Sabha Election) होत आहे. लोकसभेसह काही राज्यात निवडणुकीचा बार उडणार आहे. मोदी सरकार देशात हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहे. केंद्रात पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोदी सरकार आता विविध योजनांवर, विकास कामांवर भर देत आहे. दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोदी सरकारने सत्ता मिळवली होती. पण या पंचवार्षिकमध्ये कोरोना, त्यानंतरचे परिणाम, महागाई महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा फटका बसू नये यासाठी मोदी सरकार (Modi Government) योजना आखत आहे. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करत विमा योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचा मोदी सरकारचा प्लॅन आहे.

या योजनांचा प्रचार मोदी सरकार येत्या 3 महिन्यात ग्राम पंचायत स्तरावर केंद्राच्या दोन विमा योजनांचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. तीन महिने गावागावात जाऊन या योजनेत लोकांचा सहभाग वाढवून घेण्यात येणार आहे.

दोन लाखांचे संरक्षण या विमा योजनांचा प्रीमिअम अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागातील लोकांना हा विमा खरेदी करता यावा यासाठी या दोन्ही योजनांमधील हप्ता कमी ठेवण्यात आला आहे. या योजनेत 2 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 2 लाख रुपयांचा अपघात विम्याचा लाभ मिळतो.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतंर्गत 18 ते 50 वर्ष वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला 2 लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो. या विमा योजनेचा वार्षिक हप्ता 436 रुपयांपासून सुरु होतो. तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींना 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा मिळतो. या विम्याचा वार्षिक हप्ता केवळ 20 रुपये आहे.

या दोन्ही विमा योजना पोस्ट ऑफिस अथवा बँकांमधून घेता येतात. या योजनेसाठी ग्राहकाला त्याच्या खात्यातून रक्कम आपोआप कपात करण्याची परवानगी देता येते. त्यामुळे पुढे त्याला आठवण न ठेवता त्याच्या खात्यातून आपोआप या योजनेसाठी रक्कम कपात होते. या ऑटो-डेबिट सुविधेचा त्यांना लाभ मिळतो. दरवर्षी त्यांना या विम्याचे संरक्षण मिळते.

30 जूनपर्यंत मोहिम केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्त सेवा विभागाने या दोन्ही योजनेविषयी जागरुकता वाढविण्यासाठी 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येते. देशातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीत विमा योजनेची माहिती आणि फायदे सांगण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत, राज्य सरकार, केंद्र सरकारचे अधिकारी, बँकेचे कर्मचारी सहकार्य करतील.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.