AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स, टाटा, प्रेमजी यांच्यात अव्वल कोण? पाहा संपूर्ण यादी

सर्वाधिक निधी रिलायन्स इंडस्ट्रीजने केलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण 922 कोटी रुपये खर्च केलेत. इंडिया इंकने खर्च केलेल्या संपूर्ण रकमेपैकी 10 टक्के योगदान रिलायन्स करते. दुसऱ्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. TCS ने CSR वर एकूण 674 कोटी रुपये खर्च केले.

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स, टाटा, प्रेमजी यांच्यात अव्वल कोण? पाहा संपूर्ण यादी
मुकेश अंबानी
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Dec 08, 2021 | 12:00 AM
Share

नवी दिल्लीः Corporate Social Responsibility: कोरोनाच्या काळात भारतीय कंपन्यांनी सामाजिक कार्यावर फारच कमी खर्च केलाय. 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) वर एकूण 8828 कोटी रुपये खर्च केलेत. त्यात वार्षिक आधारावर 64 टक्क्यांची घसरण नोंदवली गेलीय, असंही एका अहवालात म्हटलंय.

संपूर्ण रकमेपैकी 10 टक्के योगदान रिलायन्स करते

अहवालानुसार, सर्वाधिक निधी रिलायन्स इंडस्ट्रीजने केलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण 922 कोटी रुपये खर्च केलेत. इंडिया इंकने खर्च केलेल्या संपूर्ण रकमेपैकी 10 टक्के योगदान रिलायन्स करते. दुसऱ्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. TCS ने CSR वर एकूण 674 कोटी रुपये खर्च केले. या यादीत विप्रो तिसऱ्या क्रमांकावर आहे. विप्रोच्या वतीने 246 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

रिलायन्स नेहमीच सामाजिक कामांवर खर्च करण्यास कटिबद्ध आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत रिलायन्सनेही मोठा पाठिंबा दिलाय. कोरोनाविरुद्धच्या लढाईत रिलायन्सने विविध राज्य सरकारे आणि केंद्राला 561 कोटींचा निधी जारी केलाय.

नियमांमध्ये बदल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सरकारने सीएसआर निधीबाबत नियम बदललेत. कोरोना रुग्णांसाठी कंपन्या जे काम करतील ते CSR अंतर्गत नोंदवले जातील, असे सरकारने म्हटलेय. कोरोनासाठी कंपन्यांच्या वतीने करण्यात आलेला खर्च CSR निधीमध्ये मोजला जात आहे.

अमेरिकेतील वॉल्टन कुटुंबाप्रमाणे मुकेश अंबानी मुलांमध्ये संपत्ती वाटणार

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​(RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी आपला हा अवाढव्य पसरलेला व्यवसाय पुढच्या पिढीपर्यंत देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत. ते जगभरातील अब्जाधीश कुटुंबांमध्ये वारसा वाटप किंवा वारस निवड पद्धतींचा अभ्यास करीत आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर भाऊ अनिल अंबानी यांच्यासोबत भागभांडवल वाटपाच्या वादामुळे ते आधीच सावध झालेत आणि आता या कामासाठी योग्य मॉडेल शोधत आहे, जेणेकरून मुलांमध्ये भविष्यातील मालमत्तेवरून वाद होऊ नयेत.

संबंधित बातम्या

20 कोटी दंड किंवा दीड वर्षाची शिक्षा; सरकार क्रिप्टोकरन्सीविरोधात प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

झूम मीटिंगद्वारे ‘त्या’ कंपनीच्या थेट 900 जणांना नारळ, नोकरीवरून काढणारे सीईओ नेमके कोण?

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...