AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agniveer Scheme: अग्निवीर आणि लष्करी जवानांतला नेमका फरक काय? खालील 6 मुद्दे दर्शवतात फरक

याशिवाय अग्निवीरांना प्रवास आणि पेहराव भत्ताही मिळणार आहे. अग्निवीर लष्करासोबत जेवण करतील आणि कामंही करतील, असं लष्करानं म्हटलं आहे.

Agniveer Scheme: अग्निवीर आणि लष्करी जवानांतला नेमका फरक काय? खालील 6 मुद्दे दर्शवतात फरक
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग, आतापर्यंत तब्बल 26 बळी, काय आहे ISI चा प्लॅन?Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 20, 2022 | 3:48 PM
Share

अग्निवीरांसाठी (Agniveer) असलेल्या अटी आणि सुविधांची यादी भारतीय लष्कराने रविवारी जाहीर केली. अग्निवीरांना लष्कराच्या जवानांइतकाच कष्ट भत्ता (Hardship Allowance) मिळेल असे लष्कराने म्हटले आहे. याशिवाय अग्निवीरांना प्रवास आणि पेहराव भत्ताही (Travel And Dress Allowance) मिळणार आहे. अग्निवीर लष्करासोबत जेवण करतील आणि कामंही करतील, असं लष्करानं म्हटलं आहे. पण लष्कर आणि अग्निवीरांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांची ओळख आणि सेवाशर्ती यात काय फरक असेल जाणून घेऊयात

1. सैलरी: लष्कर विरुद्ध अग्निवीर

  • अग्निवीरांना मिळणाऱ्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना रुजू झाल्या झाल्याच 30 हजार रुपये पगार मिळेल. पण यातून सरकार पगाराच्या 30 टक्के रक्कम कापून अग्निवीरांच्या नावाने सर्व्हिस फंड या फंडात जमा करणार आहे. म्हणजेच अग्निवीरला पहिल्या वर्षी 21 हजार रुपये रोख रक्कम हातात मिळेल. आणि हे संपूर्ण वर्षासाठी लागू होतील. विशेष म्हणजे सरकार जेवढा पैसा अग्निवीरच्या पगारातून कापते तेवढेच पैसे ते त्या सर्व्हिस फंडात जमा करणार.
  • अग्निवीरला रुजू होऊन पहिल्या वर्षी 30 हजार पगार मिळणार आहे. यातील 30 टक्के म्हणजे सरकारकडून 9 हजार रक्कम कापून अग्निवीरांच्या निधीत जमा अशा प्रकारे पहिल्या महिन्यातील 21 हजार पगाराव्यतिरिक्त त्याच्या सर्व्हिस फंड फंडात आणखी 18 हजार रुपये जमा होणार आहेत.
  • आता सेनेबद्दल बोलूया. जवानाचा सैन्यात पहिला प्रवेश हा सैनिक म्हणून होतो. दहावी पास झालेला तरुण शिपाई झाला तर त्याचा मूळ पगार सुमारे 21 हजार 700 रुपये रुपये आहे. याशिवाय लष्करी सेवा वेतनापोटी त्याला 5200 रुपये मिळतात. याशिवाय ट्रान्सपोर्ट अलाउंसमध्ये त्याला जवळपास 1800 रुपये मिळतात. यानंतर या तिघांवर त्याला 34 टक्के महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता सुमारे 9758 रुपये आहे. अशा प्रकारे पहिल्या महिन्यात शिपायाला सुमारे 39 हजार रुपये पगार मिळतो.
  • त्याचबरोबर अग्निवीरांचा दुसऱ्या वर्षीचा ढोबळ पगार 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार असेल. 30 कट केल्यानंतर उरलेले पैसे त्याच्या हातात येतील.

2. डीएचा लाभ मिळणार नाही

लष्करात भरती होणाऱ्या सैनिकाबरोबर फायदा असा की, केंद्र सरकारच्या धोरणांनुसार त्याला वर्षातून दोनदा डीए वाढीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर अग्निवीरचा पगार किमान एका वर्षासाठी निश्चित केला जातो.

3. सेवा कालावधी

अग्निवीरांची नोकरी ४ वर्षांसाठी असेल, पण लष्कराचे जवान किमान १५ वर्षे काम करतात तरच त्यांना पेन्शन आणि निवृत्तीच्या सुविधा मिळण्याचा हक्क आहे.

4. पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे फायदे

लष्कराच्या जवानांना 15 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. तर अग्निवीरांना 4 वर्षानंतर पेन्शन-ग्रॅच्युइटीसारखा कोणताही लाभ मिळणार नाही. होय, अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा कालावधीत कपात करण्याचा निधी एकरकमी रक्कम म्हणून नक्कीच मिळेल. ही रक्कम 10.04 लाख असेल. यावर व्याज जोडल्यानंतर ही रक्कम 11.71 लाख रुपये होईल, जी अग्निवीरांना सेवानिधी पॅकेज म्हणून मिळणार आहे. ही रक्कम आयकरमुक्त असेल.

5. सुट्ट्यांमध्ये कपात

अग्निवीरांना वर्षभरात 30 सुट्ट्या दिल्या जातील, असे सरकारने जाहीर केले आहे. आणि त्यांना गरजेनुसार वैद्यकीय रजा दिली जाईल. लष्कराच्या नियमित सेवेत सेवा बजावणाऱ्यांना वर्षाला 90 सुट्ट्या मिळतात.

6. बॅजेस वेगळे असतील

अग्निवीरांना एक वेगळी ओळख मिळेल, असं लष्करानं म्हटलं आहे. ‘अग्निवीर’ त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या गणवेशावर “विशिष्ट चिन्ह” परिधान करेल. याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. म्हणजे अग्निवीरांचा बिल्ला लष्कर, नौदल, हवाईदल यांपेक्षा वेगळा असेल. हवाई दलात अग्निवीर स्वतंत्र रँक तयार करेल, जे इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळे असेल, असे आयएएफने म्हटले आहे. अग्निवीर त्याच्या सेवेदरम्यान त्याच्या गणवेशावर एक विशिष्ट चिन्ह परिधान करेल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.