AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुडत असल्याचं पाहून वाचवायला गेले आणि सगळेच बुडाले! चौघा अल्पवयीनांसह 7 जणांचा मृत्यू, नेमकी कुठं घडली घटना?

सात जणांचा बुडून मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

बुडत असल्याचं पाहून वाचवायला गेले आणि सगळेच बुडाले! चौघा अल्पवयीनांसह 7 जणांचा मृत्यू, नेमकी कुठं घडली घटना?
बुडून मृत्यूImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2022 | 9:37 AM
Share

मुंबई : रविवारी मावळमध्ये (Pune News) इंद्रायणी नदीत गोधडी धुवायला गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकूण सात जणांचा बुडून मृत्यू (Drowned) झाला आहे. सात मृतांपैकी चौघेजण हे अल्पवयीनं होते. ही घटनाही रविवारीच घडली. तामिळनाडूच्या (Tamil Nadu News) गेडीलाम नदीत सात जण बुडाले होते. सुरुवातीला काही जण बुडत होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्यांचाही बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केलीय. सात जणांचा बुडून मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

कुठे घडली घटना?

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील पनरुट्टीजवळ असलेल्या किलारुंगुनाम या गावात ही दुर्दैवी घटना घडली. सात जणाांचा बुडून मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. या भागात असलेल्या गेडीलाम नदीत ही दुर्दैवी घटना घडली.

पाच लाखांची मदत

दरम्यान, या घटनेनं राज्यपाल आरएन रवी यांनीही खेद व्यक्त केलाय. मृतांच्या नातेवाईकांना ईश्वर या कठीण प्रसंगातून लढण्याचं बळ देवो, अशी प्रार्थनना त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री पब्लिक रिलिफ फंडातून ही मदत देण्यात येणार आहेत.

पाहा महाराष्ट्रातील पावसाची बातमी :

काळजी घ्या! प्रशासनाला निर्देश

या घटनेनंतर आता प्रशासनाला उपाययोजना करण्याचेही निर्देश जारी करण्यात आले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी सूचना फलक आणि सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.