AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणपणात एक वाकडं पाऊल… म्हतारपणात मिळाली शिक्षा… 85 व्या वर्षी न्यायालयाने ठोठावला  तुरुंगवास

Bihar Old Man sentenced by the Court: आयुष्यात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. तरुणपणातील एक चूक किती महागात पडू शकते हे या उदाहरणावरून कळेल. एका 85 वर्षाच्या वृद्धाला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे हे प्रकरण?

तरुणपणात एक वाकडं पाऊल... म्हतारपणात मिळाली शिक्षा... 85 व्या वर्षी न्यायालयाने ठोठावला  तुरुंगवास
वृद्धाला कारावासाची शिक्षाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 03, 2026 | 10:19 PM
Share

85 Years Old Man Sentenced for Three Years Prisons: 85 वर्षाच्या या वृद्धाला धडा चालता सुद्धा येत नव्हतं. त्याला दोन माणसांनी धरून आणलं तरी त्याला पाऊल टाकवेना.  एका गुन्ह्यात बिहारमधील न्यायालयाने या वृद्धाला सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  वैशाली जिल्ह्यातील न्यायालयाने एका कुटुंबातील 5 सदस्यांना ज्यात एक 85 वर्षांच्या वृद्धाचा पण समावेश आहे, ही शिक्षा ठोठावली. 34 वर्षांपूर्वी एकाची हत्या करण्याच्या प्रयत्नात या सर्वांना तुरुंगावास ठोठावला.  दोषींना दंडही भरावा लागणार आहे. हा खटला तीन दशकांपासून सुरू होता. याप्रकरणातील 4 दोषींचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांनी मंगळवारी याप्रकरणात फैसला सुनावला.  4 दोषींना प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर   वयोवृद्ध 85 वर्षीय दीपा राय यांना 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. अर्थात दीपा राय यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यांचे वय पाहता न्यायालयाने अंतरिम जामीन दिला. न्यायालयाने सर्व पाचही दोषींना, दीपा राय यांच्यासह जगदीश राय, नागदेव राय, नरेश राय आणि नकेश्वर राय यांना प्रत्येकी 25,000 रुपयांचा दंड ठोठावला.

काय आहे प्रकरण?

10 नोव्हेंबर 1992 मध्ये जुरावनपूर गावात ही घटना घडली होती. अदालत राय आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या घराबाहेर बसलेले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरासमोर काचेचे तुकडे टाकत होते. तेव्हा कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि आरोपींनी अदालत राय आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. त्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात एकूण 9 जणांना आरोपी करण्यात आले होते.

घटनेच्या 6 महिन्यानंतर दोषारोपपत्र दाखल

अतिरिक्त सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मार्च 1993 मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. 17 जून, 1999 आरोपींविरोधात दोष निश्चित झाले. त्यानंतर कोर्टात अनेक दिवस सुनावणी चालली. गुन्ह्यातील पाच दोषींविरोधात खटला चालला. चार जणांचा मृत्यू झाला. तर सर्वात वयोवृद्ध दीपा राय यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात