AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी नैनीताल मग जयपूर फिरायला गेले कुटुंब, हॉटेलमधून रिक्षात बसले अन् त्यानंतर परतलेच नाही, कुटुंबासोबत काय घडलं?

आग्रा येथील औषध व्यापारी आपल्या कुटुंबासोबत नैनीताल फिरायला गेले. तेथून एन्जॉय करुन घरी परतले. यानंतर कार घरी उभी करुन पुन्हा भाड्याच्या कारने जयपूरला गेले, मात्र पुन्हा परतलेच नाहीत.

आधी नैनीताल मग जयपूर फिरायला गेले कुटुंब, हॉटेलमधून रिक्षात बसले अन् त्यानंतर परतलेच नाही, कुटुंबासोबत काय घडलं?
डोंबिवलीत दीड वर्षातून 148 मुलं बेपत्ताImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2023 | 9:33 PM
Share

आग्रा : उत्तर प्रदेशातील औषध व्यापारी कुटुंबासह जयपूरला गेले. तेथे एक रात्र काढल्यानंतर सकाळी रिक्षा पकडून कुटुंब कुठेतरी गेले. मात्र यानंतर ते पुन्हा परतलेच नाही. दोन आठवडे झाले तरी कुटुंबाचा पत्ता लागत नसल्याने सर्वच हैराण झाले आहेत. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या भावाने ट्रान्स यमुना पोलीस ठाण्यात भावाचे कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस बेपत्ता कुटुंबाचा शोध घेत आहेत. राजेश शर्मा असे बेपत्ता व्यापाऱ्याचे नाव आहे. बेपत्ता झाल्याापासून सर्वांचे फोनही बंद येत आहेत. पोलिसांनी शर्मा कुटुंबाचा शोध सुरु केला आहे. पोलीस राजेश शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वत्र शोध घेत आहेत. राजेश शर्माचे मित्र, व्यवसायातील प्रतिस्पर्धी आणि आग्रा येथील व्यवहारांशी संबंधित लोकांची माहिती पोलीस गोळा करत आहेत.

आधी नैनीतालला गेले, तेथून घरी परतले

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील 50 वर्षीय औषध विक्रेते राजेश शर्मा हे 15 एप्रिल रोजी कुटुंबासह नैनीतालला फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीमा शर्मा, मुलगी काव्या, मुलगा अभिषेक, सून उषा आणि एक वर्षाचा नातू होता. नैनीतालला जाताना राजेशने फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले. त्यानंतर ते तेथून आपल्या घरी परतले.

कार घरी उभी केली अन् जयपूरला गेले

नैनीतालहून परतल्यानंतर शर्मा यांनी कार घरी उभी केली. यानंतर कोणालाही न सांगता भाड्याने घेतलेल्या इनोव्हा कारमधून संपूर्ण कुटुंबासह जयपूरला गेले. रात्री उशिरा तेथे पोहोचले आणि एका हॉटेलमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास हॉटेलमधून ऑटो घेऊन कुठेतरी निघाले. यानंतर राजेश आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संपूर्ण कुटुंब नॉट रिचेबल

मोबाईल बंद असल्याने नातेवाईक कुटुंबातील कोणाशीही संपर्क करू शकत नाही. शर्मा यांचे भाऊ रमाकांत याच्यासोबत 23 एप्रिल रोजी शेवटचे बोलणे झाले होते. सध्या भाऊ रमाकांतने आग्रा येथील ट्रान्स यमुना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाच्या अशा अचानक बेपत्ता होण्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.