AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident : यमुनानगरमध्ये कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात; कारने पाच जणांना चिरडल्यामुळे जमावाचा उद्रेक

अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. संतप्त जमावाने रागाच्या भरात अपघाताला कारणीभूत ठरलेली होंडा सिटी कार पेटवून दिली. यमुनानगरच्या प्रसिद्ध एसके रोडवरील धौलरा गावात हा भीषण अपघात झाला.

Accident : यमुनानगरमध्ये कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात; कारने पाच जणांना चिरडल्यामुळे जमावाचा उद्रेक
यमुनानगरमध्ये कावड यात्रेदरम्यान भीषण अपघातImage Credit source: tv9
| Updated on: Jul 25, 2022 | 3:01 AM
Share

यमुनानगर : कावड यात्रेदरम्यान एका होंडा कार (Honda Car)ने पाच जणांना चिरडल्याची घटना यमुनानगरमध्ये रविवारी सायंकाळी घडली आहे. भरधाव वेगातील होंडा सिटी कारवरील चालकाचे नियंत्रण (Control) सुटले आणि या कारने रस्त्याशेजारून निघालेल्या पाच जणांना चिरडले. या अपघाता (Accident)नंतर परिसरातील नागरिक तसेच अपघातग्रस्तांचे नातेवाईक संतप्त झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. संतप्त जमावाने रागाच्या भरात अपघाताला कारणीभूत ठरलेली होंडा सिटी कार पेटवून दिली. यमुनानगरच्या प्रसिद्ध एसके रोडवरील धौलरा गावात हा भीषण अपघात झाला. कारच्या धडकेत 3 यात्रेकरु गंभीर जखमी झाले असून दोघांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे.अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याचा फवारा करून कारला लागलेली आग विझवली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुख्य रस्त्यावरील वाहतूक जवळपास पाच तास ठप्प

होंडा सिटी कार पेटवून दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. कार पेटवून देताना मोठा जमाव रस्त्यावर होता. अपघातानंतर पळून गेलेला चालक हाती न लागल्यामुळे नातेवाईकांना आपला संताप नियंत्रणात ठेवणे कठीण गेले. त्या रागात कार पेटवण्यात आली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. राज्यात शासनाकडून कोणतीही सुविधा दिली जात नसल्याचे कावड यात्रेकरुंनी सांगितले. तसेच यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी कोणतीही योग्य व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हा अपघात झाला, तर उत्तर प्रदेश सरकारने यात्रेकरुंसाठी उत्तम व्यवस्था केली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ

अपघाताची माहिती मिळताच रादौर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजकुमार यांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमींना उपचारासाठी यमुनानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तसेच एसडीएम रादौर सतेंद्र सिवाच आणि डीएसपी रादौर रजत गुलिया हे देखील मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार चालकावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यात्रेकरुंना दिले. मात्र त्यांच्या आश्वासनानंतरही यात्रेकरुंनी रास्ता रोकोतून माघार घेतली नाही. परिणामी रादौर येथील एसके रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासन्तास वाहन चालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक मार्गही वळवले. (Accident during Kavad Yatra in Yamunanagar, Five people injured)

ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.