AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर छापा, छापेमारीत काय सापडले?

एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ई-सिगारेट विक्रीचे चार गुन्हे नोंदवले गेले, ज्यामध्ये मुच्छड पानवालाचा मालक शिवकुमार तिवारीच्या अटकही झाली. खेतवाडी परिसरातील त्याच्या गोदामासह पान दुकानावर छापा टाकण्यात आला.

मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर छापा, छापेमारीत काय सापडले?
मुच्छड पानवालाच्या दुकानावर छापेमारीImage Credit source: ANI
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 16, 2023 | 2:57 PM
Share

मुंबई : गिनिज बुकमध्ये नोंद असलेला मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाच्या मालकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने मुच्छड पानावालाच्या खेतवाडीतील दुकानात छापेमारी केली. छापेमारी दरम्यान पोलिसांना त्याच्या गोदामाची मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोदामातही छापा टाकला. या छापेमारीत 15 लाखाची ई-सिगारेट हस्तगत करण्यात आली आहे. मुच्छड पानावालाचा मालक शिवकुमार तिवारी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. क्राईम ब्रँचने शाळा आणि महाविद्यालयांजवळ विकल्या जाणाऱ्या ड्रग्ज आणि ई-सिगारेटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन आठवड्यात अंमली पदार्थ विरोधी सेल (ANC) आणि समाजसेवा शाखा (SSB)ने केलेल्या अनेक ऑपरेशन्समध्ये, हजारो ई-सिगारेट आणि कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे.

दुकान आणि गोदामावर छापा

एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ई-सिगारेट विक्रीचे चार गुन्हे नोंदवले गेले, ज्यामध्ये मुच्छड पानवालाचा मालक शिवकुमार तिवारीच्या अटकही झाली. खेतवाडी परिसरातील त्याच्या गोदामासह पान दुकानावर छापा टाकण्यात आला.

या छाप्यात निकोटीन आणि तंबाखूची चव असलेल्या शेकडो ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 च्या कलम 7, 8, आणि 9 अंतर्गत जप्ती करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट कुठून आणल्या याचा तपास सुरू आहे. झडतीदरम्यान, एनसीने 1,36,500 रुपये किमतीचच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत.

कोण आहे मुच्छड पानावाला?

मुच्छड पानवाला हे मुंबईतील प्रसिद्ध पान शॉप आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, मुंबईतील अनेक प्रसिद्ध उद्योगपती आणि टेक टायकून येथे पान खाण्यासाठी येतात. हे दुकान मुंबईत 70 च्या दशकापासून सुरू आहे आणि आता त्याचे नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांची स्वतःची वेबसाइट देखील आहे. हे पान शॉप ऑनलाइन फूड ऑर्डरिंग पोर्टलवरही ऑर्डर घेते.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!