AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच दिवस घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ, कुठे घडला प्रकार ?

या तरुणींनी स्वत:चे जीवन संपवले की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पाच दिवस घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ, कुठे घडला प्रकार ?
| Updated on: Feb 03, 2025 | 10:18 PM
Share

घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह भाम धरणात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणी ३० जानेवारीपासून घरातून गायब झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरातील लोक पोलिस ठाण्याच्या चकरा मारीत होते. परंतू कोणतेही यश मिळत नव्हते, सर्व ठिकाणी शोधूनही घरातील तरुण मुली सापडत नसल्याने मुलींच्या आई-वडिलांना अन्न – पाणी सोडले होते. अचानक इगतपूरी येथील भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आऊटलेट जवळ दोन तरुणींचे मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणींनी स्वत:ला संपवले की त्यांना कोणी ढकलले याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथे भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आऊटलेटमध्ये दोन बेपत्ता तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कांचनगांव परिसरातील ठाकुरवाडी येथील मनिषा भाऊ पारधी (वय १९ ) आणि सरीता काळु भगत ( वय १८ ) यांचे हे मृतदेह असल्याचे उघडकीस आले आहे. या मुली घरातून ३० जानेवारीपासून बेपत्ता झाल्या होत्या. या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यात दि. ३० जानेवारी रोजी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आत्महत्या की  घातपात

गेल्या पाच दिवसांपासून दोन तरुणी बेपत्ता झाल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती. सोमवारी दुपारी या तरुणींचे मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना धरणाच्या आऊटलेट येथे आढळले. त्यांनी याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शेनवड बुद्रुकचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू, रमेश शंकर गांगड,देविदास निवृत्ती केवारे, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिळंदे आणि मदन बिन्नर यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यातून या तरुणीचे मृतदेह बाहेर काढले. या दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला आहे. आणि शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. घोटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या तरुणींनी आत्महत्या केली की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.