AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच दिवस घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ, कुठे घडला प्रकार ?

या तरुणींनी स्वत:चे जीवन संपवले की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पाच दिवस घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ, कुठे घडला प्रकार ?
| Updated on: Feb 03, 2025 | 10:18 PM
Share

घरातून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचे मृतदेह भाम धरणात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणी ३० जानेवारीपासून घरातून गायब झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरातील लोक पोलिस ठाण्याच्या चकरा मारीत होते. परंतू कोणतेही यश मिळत नव्हते, सर्व ठिकाणी शोधूनही घरातील तरुण मुली सापडत नसल्याने मुलींच्या आई-वडिलांना अन्न – पाणी सोडले होते. अचानक इगतपूरी येथील भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आऊटलेट जवळ दोन तरुणींचे मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणींनी स्वत:ला संपवले की त्यांना कोणी ढकलले याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथे भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आऊटलेटमध्ये दोन बेपत्ता तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कांचनगांव परिसरातील ठाकुरवाडी येथील मनिषा भाऊ पारधी (वय १९ ) आणि सरीता काळु भगत ( वय १८ ) यांचे हे मृतदेह असल्याचे उघडकीस आले आहे. या मुली घरातून ३० जानेवारीपासून बेपत्ता झाल्या होत्या. या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यात दि. ३० जानेवारी रोजी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आत्महत्या की  घातपात

गेल्या पाच दिवसांपासून दोन तरुणी बेपत्ता झाल्याने त्यांची शोधाशोध सुरु होती. सोमवारी दुपारी या तरुणींचे मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना धरणाच्या आऊटलेट येथे आढळले. त्यांनी याबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शेनवड बुद्रुकचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू, रमेश शंकर गांगड,देविदास निवृत्ती केवारे, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिळंदे आणि मदन बिन्नर यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यातून या तरुणीचे मृतदेह बाहेर काढले. या दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला आहे. आणि शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. घोटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या तरुणींनी आत्महत्या केली की त्यांच्याबाबत काही घातपात घडला याचा संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Follow Us
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...