AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Woman Cricketer Death : काही दिवसांपासून बेपत्ता होती, मग महिला क्रिकेटरचा थेट मृतदेहच आढळला !

पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये 25 महिला सहभागी होणार होत्या. यासाठीच त्या टूर्नामेंटची तयारी करत होत्या. मात्र एक दिवस अचानक राजश्री बेपत्ता झाली. यानंतर तिच्या कोचने ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली.

Woman Cricketer Death : काही दिवसांपासून बेपत्ता होती, मग महिला क्रिकेटरचा थेट मृतदेहच आढळला !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
| Updated on: Jan 14, 2023 | 8:18 PM
Share

कटक : काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला क्रिकेटरचा मृतदेह सापडल्याने ओडिसातील कटक शहरात एकच खळबळ माजली आहे. राजश्री स्वाई असे मयत महिला क्रिकेटरचे नाव आहे. राजश्री गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. राजश्रीच्या कोचने ती बेपत्ता झाल्याची तक्रारही कटक शहर पोलिसात नोंदवली होती. पोलीस अनेक दिवसापासून राजश्रीचा शोध घेत होते. मात्र ती कुठेच सापडत नव्हती. अखेर तिचा मृतदेह शहराजवळील घनदाट जंगलात आढळला. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. महिलेच्या घरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आगामी टूर्नामेंटची तयारी करत होती

पुद्दुचेरी येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये 25 महिला सहभागी होणार होत्या. यासाठीच त्या टूर्नामेंटची तयारी करत होत्या. मात्र एक दिवस अचानक राजश्री बेपत्ता झाली. यानंतर तिच्या कोचने ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली.

काही दिवसांपासून बेपत्ता होती

बराच शोध घेऊनही राजश्री सापडत नव्हती. अखेर काही दिवसांनी तिचा मृतदेह शहराजवळीस घनदाट जंगलात लटकलेल्या अवस्थेत आढळला. तसेच तिची स्कूटरही तेथेच पडलेली आढळली.

कुटुंबीयांचा राजश्रीच्या हत्येचा दावा

महिलेच्या शरीरावर मारल्याच्या जखमा होत्या. तसेच तिच्या एका डोळ्यालाही जखम झाली आहे. यावरुन तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप राजश्रीच्या घरच्यांनी केला आहे.

तपासाअंतीच मृत्यूचे खरे कारण कळेल

याप्रकरणी कटक शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंतीच राजश्रीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? आणि तिची हत्या झाली असेल तर कुणी आणि कोणत्या कारणातून केली? याचा उलगडा होईल.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.