AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कीटकनाशक पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्यांना उलट्या होऊ लागल्या, डॉक्टरकडे नेले पण…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवण्यासाठी धान्यात कीटकनाशक पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरभर पसरला होता.

कीटकनाशक पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्यांना उलट्या होऊ लागल्या, डॉक्टरकडे नेले पण...
कीटकनाशकाच्या वासाने उलट्या होऊन बहिण-भावाचा मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Feb 15, 2023 | 8:57 AM
Share

कराड / दिनकर थोरात (प्रतिनिधी) : धान्य साठवण्यासाठी टाकलेल्या कीटकनाशक पावडरच्या उग्र वासाने उलट्यांचा त्रास होऊन भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कराडमध्ये घडली आहे. कराड तालुक्यातील मुंढे गावात ही घटना घडली आहे. श्लोक अरविंद माळी वय 3 वर्षे व तनिष्क अरविंद माळी वय 7 अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. उग्र वासामुळे श्लोक आणि तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कराड पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवण्यासाठी धान्यात कीटकनाशक पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरभर पसरला होता.

पावडरच्या उग्र वासामुळे मुलांना उलट्या होऊ लागल्या

दरम्यान या उग्र वासामुळेच श्लोक आणि तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे सोमवारी प्रथम तीन वर्षाच्या श्लोकला उलट्या आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा मृत्यू

उपचार सुरू असतानाच सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही उलट्या आणि खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिलाही नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला.

श्लोकच्या शवाविच्छेदन अहवालात अंतर्गत अति रक्तस्त्रावामुळे आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तनिष्काचे मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदन केले असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळाला नसल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.