AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! बुलडाण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला

बुलडाणा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना बुलडाणाच्या (Buldhana) खामगाव तालुक्यातील पळशी इथं घडलीय. एका 28 वर्षीय तरुणानं लग्न जमत नसल्यामुळं टोकाचं पाऊल उचललं. महेंद्र बेलसरे (Mahendra Belsare) हा तरुण लग्न जमत नसल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकला आणि त्यातूनच त्याने सरण रचून आत्महत्या (Suicide) केली! महेंद्र बेलसरे या तरुणाने स्वत:च्या शेतात सरण रचून स्वत:ला पेटवून घेतलं […]

लग्न जुळत नसल्यानं तरुणानं जीवनयात्रा संपवली, सरण रचून आत्महत्या! बुलडाण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला
लग्न जुळत नसल्यामुळे तरुणाची आत्महत्या
| Edited By: sagar joshi | Updated on: Feb 17, 2022 | 10:52 PM
Share

बुलडाणा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना बुलडाणाच्या (Buldhana) खामगाव तालुक्यातील पळशी इथं घडलीय. एका 28 वर्षीय तरुणानं लग्न जमत नसल्यामुळं टोकाचं पाऊल उचललं. महेंद्र बेलसरे (Mahendra Belsare) हा तरुण लग्न जमत नसल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकला आणि त्यातूनच त्याने सरण रचून आत्महत्या (Suicide) केली! महेंद्र बेलसरे या तरुणाने स्वत:च्या शेतात सरण रचून स्वत:ला पेटवून घेतलं आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महेंद्र हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा असल्यानं बेलसरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसंच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

महेंद्रने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं?

महेंद्र बेलसरे हा खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द या गावाचा रहिवासी होता. त्याचं वय 28 वर्षे होतं. त्याच्या कुटुंबाकडे 3 एकर बागायती शेती आहे, तर दुसऱ्यांची त्यांनी 8 ते 10 एक शेती ते कसत होते. मागील अनेक दिवसांपासून महेंद्रसाठी मुलगी पाहण्याचं काम सुरु होतं. मात्र, त्याचे लग्न काही केल्या जमत नव्हते. यामुळे महेंद्र नैराशाच्या गर्तेत अडकला. अशा परिस्थितीत बुधवारी गावात 2 लग्न समारंभ होते. गावातील जवळपास सर्वजण या लग्न सोहळ्याकडे होते. तेव्हा महेंद्र आपल्या शेतात गेला. तिथे त्यांने सरण रचलं. अंगावर पेट्रोल ओतून घेत तो सरणावर चढला आणि स्वत:ला पेटवून घेतलं. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी महेंद्रच्या शेताकडे धावले. मात्र, तोपर्यंत सर्वकाही संपलं होतं.

मागील काही दिवसांपासून महेंद्रचं लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, लग्न जुळत नसल्यामुळे महेंद्र सतत नाराज असायचा. या नैराश्यातूनच त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याच गावकरी सांगतात. याबाबत बुलडाणा पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या : 

Breaking : दिल्लीत सीमापुरी भागात संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, स्पेशल सेल आणि NSG कडून तपास सुरु

‘मेरा पैसा वापस कर’, मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली