AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratnagiri Girls Attack : जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला, एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी

भालावली सिनियर कॉलेजमध्ये धारतळे येथे साक्षी गुरव आणि सिद्धी गुरव या दोघी मैत्रिणी शिक्षण घेतात. दोघीही एकाच गावातील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आज दुपारी 12 वाजता कॉलेज संपल्यानंतर साक्षी आणि सिद्धी घरी चालल्या होत्या.

Ratnagiri Girls Attack : जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणींवर हल्ला, एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी
जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणींवर हल्लाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 18, 2023 | 7:43 PM
Share

रत्नागिरी : भावकीतील जमिनीच्या वादातून महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना राजापूर तालुक्यातील भालावली येथे घडली आहे. यावेळी मैत्रिणीला वाचवायला मध्ये पडलेल्या तरुणीवरही आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात सदर तरुणीचा मृत्यू झाला. तर दुसरी गंभीर जखमी असून, तिला उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साक्षी मुकुंद गुरव असे मयत झालेल्या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. सिद्धी संजय गुरव असे 21 वर्षीय जखमी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी नाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विनायक गुरव असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

दुपारी कॉलेज सुटल्यानंतर घरी चालल्या होत्या दोघी

भालावली सिनियर कॉलेजमध्ये धारतळे येथे साक्षी गुरव आणि सिद्धी गुरव या दोघी मैत्रिणी शिक्षण घेतात. दोघीही एकाच गावातील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आज दुपारी 12 वाजता कॉलेज संपल्यानंतर साक्षी आणि सिद्धी घरी चालल्या होत्या.

वाटेत दबा धरुन बसलेल्या आरोपीने प्राणघातक हल्ला केला

कॉलेजमधून घरी जात असतानाच वाटेत दबा धरुन बसलेल्या विनायक गुरव याने सिद्धी गुरव या तरुणीवर हल्ला केला. यावेळी साक्षी मैत्रिणीला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता आरोपीने तिच्यावकडे आपला मोर्चा वळवला.

आरोपीने सिद्धीला सोडून साक्षीवर हल्ला करण्यास सुरवात केली. या हल्ल्यात साक्षीचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेला.

जखमी सिद्धीववर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सिद्धीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेमुळे भालवली गावात तणावपूर्ण वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसपीनींही गावात दाखल होत पीडित कुटुंबाची भेट घेतली.

जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र पोलीस तपासाअंतीच सर्व स्पष्ट होईल.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...