AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये रचला संतोष देशमुख हत्येचा कट, त्या दिवशी हॉटेलमध्ये नेमके काय घडले?

केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही पुढेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत. त्यामुळे आरोपी किती वाजता आले होते, कुठे बसले होते आणि किती वेळ बसले होते? याबाबतची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली नाही.

हॉटेलमध्ये रचला संतोष देशमुख हत्येचा कट, त्या दिवशी हॉटेलमध्ये नेमके काय घडले?
| Updated on: Jan 18, 2025 | 2:10 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हॉटेलमध्ये बसून रचण्यात आला. पोलिसांच्या तपासात ही नवीन माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस सरळ त्या हॉटेलमध्ये जाऊन पोहचले. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाले. 20 दिवसांपेक्षा जुने बॅकअप नसल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही पुढेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत. खंडणी आणि खुनाच्या या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची हॉटेलमध्ये तपासणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून 9 डिसेंबर रोजी खून करण्यात आला होता. तत्पूर्वी या घटनेतील आरोपींनी 8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील तिरंगा धाबा या हॉटेलमध्ये बसून हा सगळा कट रचल्याचे समोर आले आहे. हॉटेलमध्ये केलेल्या नियोजनानुसार 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला.

चार दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्यांनी या हॉटेलला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र केवळ 20 दिवसांचे बॅकअप मिळाल्याने 8 डिसेंबरचे सीसीटीव्ही पुढेच तपास अधिकाऱ्यांना हाती लागले नाहीत. त्यामुळे आरोपी किती वाजता आले होते, कुठे बसले होते आणि किती वेळ बसले होते? याबाबतची माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली नाही. परंतु आरोपींनी तिरंगा धाब्यावर बसून संतोष देशमुख यांच्या खुनाचा कट रचल्याचे आता पुढे आले आहे.

हॉटेल मालक काय म्हणतात…

हॉटेल मालक तिरंगा धाबा बाबुराव शेळके यांनी सांगितले की, आमच्याकडे जेवण चांगले मिळते म्हणून मोठ्या संख्येने ग्राहकांची गर्दी नेहमीच असते. या गर्दीत 8 डिसेंबरला कोण आले होते? या ठिकाणी काय झाले, हे आम्हाला माहीत नाही. परंतु चार दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी आले होते. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र त्या घटनेस 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाल्यामुळे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही.

दरम्यान, या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा विनंती केली आहे. ते म्हणाले, माझी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की यामधला एकही आरोपी सुटता कामा नये. कारण हे खूप मोठे शेडयंत्र आहे. ही खूप मोठी टोळी आहे. हे सगळी संपले पाहिजे. कारण खंडणीतले आणि खुनातील आरोपी एकच आहे.

चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत...
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत....
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.