Agriculture News :खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान, मात्र सहा महिने उलटूनही…

वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात बियाणे टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Agriculture News :खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान, मात्र सहा महिने उलटूनही...
farmerImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 8:49 AM

अमरावती : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) व जिल्हा कृषी विभागाने (District Agriculture Department) दम भरल्यानंतर पिक विमा कंपनीने (Crop Insurance Company) शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही अमरावती जिल्ह्यातील 24 हजार 540 शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मात्र पीक विमा काढूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. 1 लाख 10 हजार 652 शेतकऱ्यांनी नुकसानाची तक्रारी केल्या होत्या. तर आतापर्यंत 72 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र सहा महिने उलटूनही 24 हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चांण यांनी सांगितली.

शेतरस्त्यांसाठी पाडळी शिंदे ग्रामस्थांचे उपोषण सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्ते योजनेत गावपातळीवर रस्त्यांची कामे करावी, तसेच नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे त्रस्त होऊन गावातीलच नदीपात्रात उपोषण सुरू केले आहे. मागील तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू करण्यात आले असून, बेमुदत उपोषणास बसलेल्या एकाची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी बळजबरीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. देऊळगाव राजा तहसीलदार यांनी उपोषण कर्त्याला भेट दिली. यावेळी तहसीलदार यांनी संबंधित रस्ते हे योजना बाह्य असल्याने या रस्त्याच्या कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे. मात्र, उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात बियाणे टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश प्रकल्पात आजही पाणी साठा उपलब्ध असून या पाण्याच्या आधारे उन्हाळी पिके घेत आहेत. पांगरी नवघरे या गावातील शेत पारिसरातील शेतकरी मुंग पिकाची पेरणी करीत असतानाचं चित्र दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

गेल्या पाच-सहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकच्या निफाडमध्ये थंडीची लाट कायम असल्याने तालुका गारठून निघाला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीच्या पाऱ्यात दररोज चढ-उतार होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. फुगवणीला आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे द्राक्षांच्या दरावर परिणाम होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.