‘त्या’मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले वाळू माफिया फरार, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडेंनी दिले होते चौकशीचे आदेश

बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजांपूर चकला येथे वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. आता आणि याप्रकरणातील आरोपी फरारी आहेत.

'त्या'मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले वाळू माफिया फरार, गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडेंनी दिले होते चौकशीचे आदेश
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 5:06 PM

बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील शहाजांपूर चकला येथे वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाला होता. या दरम्यान गेवराई तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा (Sand extraction) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. सामाजिक न्याय (Social justice) व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश (Minister of Special Assistance) दिले होते. त्यानंतर याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी समितीची नियुक्त केली होती. याप्रकरणी मृत मुलांच्या नातेवाईकांनी पोलीस तक्रार दाखल होऊनही यामधील संशयित आरोपी फरार झाले आहेत.

त्यानुसार या समितीने अहवाल देताच मृत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडुरंग चोरमले, विलास निर्मल, संदीप निर्मल आणि अर्जुन कोळेकर या चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसतोड कामगारांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर व पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील वाळू माफिया फरार झाले आहेत. यातील सर्व आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांना पोलीस कधी ताब्यात घेणार असा सवाल उपस्थित होतो.

शहाजांपूर चकला येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो, वाळू उपसा केल्यामुळे सिंदफणा नदीतमध्ये खोल खड्डे पडले आहेत. सततचा वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात अनेक धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. या धोकादायक तयार झालेल्या खड्यामुध्येच उसतोड कामगारांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.

मृत्यूची टांगती तलवार

यानंतर याप्रकरणातील व्यक्तिविरोंधात तक्रार दाखल झाली होती, मात्र आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, ते फरार आहेत, त्यामुळे यापक्रणातील ज्यांची मुलं पाण्यात बुडून मृत झालेत त्यांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. उसतोड कामगार मोलमोजरीसाठी वेगवेगळ्या कामासाठी जात असतात, मात्र त्यांनी योग्य ते संरक्षण आणि त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आई वडिलांबरोबर ऊस तोडीसाठी भटंकती करणाऱ्या मुलांना धोका हा कायमच असतो कारण ऊस तोड सुरू झाली की, आई वडिलांचे काम सुरू होते. आणि शेतात किंवा जवळ कुठे असणारी पाण्याची ठिकणं, नदी नाले यांचा धोका हा ठरलेला असतो.

चौकशीचे आदेश असतानाही आरोपी फरार

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुलांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असतानाही यामधील वाळू माफिया फरार झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांसह नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. मुलांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत असलेले आणि पोलिसात गुन्हा दाखल होऊनही आरोपी फरार कसे काय होऊ शकतात असा सवाल नागरिकांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Hinganghat जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेप, एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल

VIDEO: औरंगाबादेत विधानसभेवर एकही निवडून येत नाही, ही मोठी खंत, Ajit Pawar यांनी मराठवाड्यासाठी टार्गेटच ठरवलं!

Chilly : भंडाऱ्याच्या सेवकरामांना कळाले बाजारपेठेचे महत्व, भंडाऱ्याची मिरची थेट दिल्ली दरबारी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.