AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना संपवले; कुणी खेळला हा खूनी खेळ?

हत्या केल्यानंतर आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून, तिघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना संपवले; कुणी खेळला हा खूनी खेळ?
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
| Updated on: Feb 25, 2023 | 5:31 PM
Share

कारवार : संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची घटना कर्नाटकातील हडवल्ली गावाजवळ शुक्रवारी घडली. याप्रकरणी भटकळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विधवा सुनेच्या भावानेच सासू, सासरा, दीर आणि जाऊ यांची हत्या केल्याची माहिती मिळते. शंभू व्यंकटरमण भट्ट, मादेवी भट्ट, राघवेंद्र भट्ट आणि कुसुमा राघवेंद्र भट्ट हत्या करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून, तिघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

चौघांचे मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात आढळले

हडवल्ली गाव हे जंगल परिसरात असल्याने तेथे घरे एकमेकांपासून खूप दूर आहेत. शंभू भट्ट यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आढळून आला. त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्यापासून सुमारे 25 पावले मागे आढळून आला. तर पत्नीचा मृतदेह एका बाजूला आणि सुनेचा मृतदेह दुसऱ्या बाजूला पडला होता. चौघांचेही मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

घटनास्थळी उपस्थित मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मृत शंभू यांचा मोठा मुलगा श्रीधर याचा आठ वर्षांपूर्वी किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला होता. श्रीधर भट्ट याची पत्नी विद्या भट्ट हिचे सासरे शंभू भट्ट यांच्याशी मालमत्तेतील वाट्यावरुन वाद होते.

मोठी सून आणि तिच्या भावावर खुनाचा आरोप

विद्या भट्टचा भाऊ विनय भट्ट याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्या आणि तिचे वडील यांचाही या खून प्रकरणात समावेश आहे. मुख्य आरोपी विनय घटनास्थळावरून फरार आहे. खून झाला त्यावेळी मृत राजू भट्ट यांचा सहा वर्षांचा मोठा मुलगा शाळेत गेला होता, तर त्याची तीन वर्षांची मुलगी घरात झोपली होती.ते दोघेही सुरक्षित आहेत.

घटनेची माहिती मिळताच कारवारचे एसपी विष्णुवर्धन भटकळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भटकळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्याचे आदेश दिले. भटकळचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत, ग्रामीण परिमंडळाचे पोलीस निरीक्षक चंदन गोपाळ, भटकळच्या सहायक आयुक्त ममता देवी, तहसीलदार अशोक भट्ट यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.