AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजा घरात झोपलेला असतांना शेतात जे घडलंय ते संतापजनक आहे, तो सहन करतोय म्हणून किती त्रास देणार ?

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतांना नाशिकच्या कोकणगाव येथील शेतकऱ्याचा वाट्याला नवं संकट उभं राहिलं आहे. त्यावरून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बळीराजा घरात झोपलेला असतांना शेतात जे घडलंय ते संतापजनक आहे, तो सहन करतोय म्हणून किती त्रास देणार ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 10, 2023 | 11:11 AM
Share

नाशिक : शेतकऱ्यांवरील सुरू असलेली संकटांची मालिका काही केल्या कमी व्हायला तयार नाहीये. नुकतेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे ( Nashik Farmer )  मोठे नुकसान झालेले आहे. अशातच शेतीमाल कसाबसा वाचविला असला तरी शेतकरी दिवसभर कष्ट करून रात्री गाड झोपलेला असतांना त्याच्या शेतमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. नाशिक जिल्ह्यातील ( Nashik News ) निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील द्राक्षबागेत द्राक्ष पिकाची चोरी झाली आहे. प्रगतशील शेतकरी केशवराव मोरे यांच्या द्राक्ष बागेतून रात्रीतून द्राक्ष चोरीला गेले आहे. जम्बो व्हरायटीची द्राक्षबाग असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 15 ते 20 क्विंटल द्राक्ष तोडून नेल्याची घटना समोर आलेली आहे.

केशवराव मोरे यांचा बाग खरतंर काढणीला आला होता. त्यामध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी केशवराव मोरे यांच्या अक्षरशः तोंडचे पाणी पळाले असून त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

ज्या रात्री द्राक्ष चोरीची घटना घडली आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशीच सकाळी द्राक्ष काढणीसाठी मजूर येणार होते. त्यामुळे चोरट्यांनी द्राक्ष पिकावर मारलेला डल्ला कुणी मारला याची चर्चा सुरू झाली आहे.

यामधील विशेष बाब म्हणजे एका रात्रीत जवळपास दीड लाखांच्या द्राक्षावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अस्मानी संकट कोसळलेले असतांना आता पुन्हा एका नवे संकट कोसळले आहे. त्यामुळे संकटांची मालिका कधी संपणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.

स्वतःच्या मुलांना सुद्धा इतका जीव लावला नसेल इतका जीव लावून द्राक्ष बाग काढणीसाठी आला होता. अशातच एका रात्रीतून बागतील द्राक्ष चोरीला गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अद्याप गुन्हा दाखल नसला तरी चोरट्यांचा शोध घेऊ असे आश्वस्त करण्यात आले आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.