AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल चोरीला गेल्यास अजिबात टेंशन घेऊ नका, ‘ही’ प्रक्रिया केल्यास मोबाईल मिळेल परत…

सूचना पत्रकात नागरिकांसाठी क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 07 सूचना आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याची शक्यता जास्त आहे.

मोबाईल चोरीला गेल्यास अजिबात टेंशन घेऊ नका, 'ही' प्रक्रिया केल्यास मोबाईल मिळेल परत...
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Sep 29, 2022 | 8:06 PM
Share

नाशिक : मोबाईल (Mobile) चोरीला जाणे ही बाब आत्ताच्या काळात किरकोळ वाटत असली तरी ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला जातो त्याच व्यक्तीला मोबाईल चोरीला गेल्याची किंमत कळत असते. मोबाईल चोरीच्या किंवा हरवण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता तो परत मिळवून देण्यासाठी त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस दल (Maharashtra Police) आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाचा (MINISTRY OF COMMUNICATIONS) देखील उल्लेख आहे. त्यामध्ये मोबाईल / चोरीला झाल्यास तो परत मिळू शकतो. त्यासाठी शासनाने CEIR ( Central Equipment Identity Register) पोर्टलची निर्मिती केली आहे. तरी नागरिकांनी काय करावे ? अशा शीर्षकाखाली सूचना वजा माहितीपत्रक काढले आहे.

सूचना पत्रकात नागरिकांसाठी क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 07 सूचना आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याची शक्यता जास्त आहे.

1) जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.

2) जे सिमकार्ड चालू आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सुरू करून घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करिता वापरावे.

3) https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर संपर्क साधावा.

4) Block Stolen / Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व Submit वर क्लिक करावे.

5) खालील कागदपत्रे सोबत जोडावी – (सॉफ्टकॉपीची साईज 500 kb पेक्षा कमी असावी.) पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत मोबाईल खरेदी बिल कोणतेही शासकीय ओळखपत्र

6) यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.

7) हरवलेला मोबाईल Active/On झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावी.

या वरील सात सूचनामध्ये सर्वाधिक महत्वाचे म्हणजे तुम्ही मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इतर बाबी मात्र मोबाईल चोरी किंवा हरवल्यानंतर देखील उपलब्ध करता येऊ शकतील.

त्यामुळे मोबाईल चोरीला अथवा हरवला गेलास त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बाब आहे. कारण मोबाईल चोरीला अथवा हरवल्यास त्यातील संपर्क क्रमांक, महत्वाचा डाटा जात असतो.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.