AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल चोरीला गेल्यास अजिबात टेंशन घेऊ नका, ‘ही’ प्रक्रिया केल्यास मोबाईल मिळेल परत…

सूचना पत्रकात नागरिकांसाठी क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 07 सूचना आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याची शक्यता जास्त आहे.

मोबाईल चोरीला गेल्यास अजिबात टेंशन घेऊ नका, 'ही' प्रक्रिया केल्यास मोबाईल मिळेल परत...
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Sep 29, 2022 | 8:06 PM
Share

नाशिक : मोबाईल (Mobile) चोरीला जाणे ही बाब आत्ताच्या काळात किरकोळ वाटत असली तरी ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला जातो त्याच व्यक्तीला मोबाईल चोरीला गेल्याची किंमत कळत असते. मोबाईल चोरीच्या किंवा हरवण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता तो परत मिळवून देण्यासाठी त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस दल (Maharashtra Police) आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाचा (MINISTRY OF COMMUNICATIONS) देखील उल्लेख आहे. त्यामध्ये मोबाईल / चोरीला झाल्यास तो परत मिळू शकतो. त्यासाठी शासनाने CEIR ( Central Equipment Identity Register) पोर्टलची निर्मिती केली आहे. तरी नागरिकांनी काय करावे ? अशा शीर्षकाखाली सूचना वजा माहितीपत्रक काढले आहे.

सूचना पत्रकात नागरिकांसाठी क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 07 सूचना आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याची शक्यता जास्त आहे.

1) जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.

2) जे सिमकार्ड चालू आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सुरू करून घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करिता वापरावे.

3) https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर संपर्क साधावा.

4) Block Stolen / Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व Submit वर क्लिक करावे.

5) खालील कागदपत्रे सोबत जोडावी – (सॉफ्टकॉपीची साईज 500 kb पेक्षा कमी असावी.) पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत मोबाईल खरेदी बिल कोणतेही शासकीय ओळखपत्र

6) यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.

7) हरवलेला मोबाईल Active/On झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावी.

या वरील सात सूचनामध्ये सर्वाधिक महत्वाचे म्हणजे तुम्ही मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इतर बाबी मात्र मोबाईल चोरी किंवा हरवल्यानंतर देखील उपलब्ध करता येऊ शकतील.

त्यामुळे मोबाईल चोरीला अथवा हरवला गेलास त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बाब आहे. कारण मोबाईल चोरीला अथवा हरवल्यास त्यातील संपर्क क्रमांक, महत्वाचा डाटा जात असतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.