AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहनांची तोडफोड करणाऱ्यांनंतर दारुड्यांचा धिंगाणा, उच्चशिक्षित तरूणही आता मागे नाही

कल्याणमध्ये भररस्त्यात धिंगाणा करण्यात आता उच्चशिक्षित तरुणही मागे नाहीत. मध्यरात्रीच्या सुमारास उच्चशिक्षित तरुण दारुच्या नशेत परिसरात धिंगाणा करु लागले.

वाहनांची तोडफोड करणाऱ्यांनंतर दारुड्यांचा धिंगाणा, उच्चशिक्षित तरूणही आता मागे नाही
उच्चशिक्षित तरुणांचा दारु पिऊन रस्त्यात राडाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 13, 2023 | 9:53 PM
Share

कल्याण / सुनील जाधव : कल्याण-डोंबिवलीत तरुणांचा धिंगाणा थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. गेले काही दिवस दारुन पिऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या गँगने नागरिकांना हैराण केले होते. मात्र आता उच्चशिक्षित तरुणांनी यात भर घातल्याचे दिसून येते. मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने गाडी चालवत गाडीमध्ये मोठ मोठ्याने धार्मिक गाणे लावत धिंगाणा घालणाऱ्या चार तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्चिम रेतीबंदर परिसरात ही घटना घडली. तुषार गाढवे, नितीन भोंडिवले, आकाश सानप, प्रथम पवार अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे चारही तरुण उच्च शिक्षित आहेत.

मध्यरात्री गाडीत मोठ्याने धार्मिक गाणी लावून तरुणांचा धिंगाणा

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेतीबंदर परिसरात रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीत काही तरुण आले, त्यांनी घोषणबाजी सुरू केली. गाडीमध्ये मोठ्या आवाजात धार्मिक गाणी लावली होती. तरुणांचे हे कृत्य पाहून परिसरात गोंधळ उडाला. या परिसरात रमजान असल्याने पहाटे दुकान लागतात. हा गोंधळ पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. चौघे तरुण दारूच्या नशेत होते. याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.

बाजारपेठ पोलिसांकडून आरोपी अटक

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे चारही तरुण उच्चशिक्षित असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. या चार तरुणांविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलीस वेळेवर पोहोचले म्हणून या तरूणांच्या हातून संभाव्य मोठा अनर्थ टळला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.