AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे काय घडले की सुखी संसाराचा कालव्यात अंत झाला, पती आणि मुलांना कालव्यात ढकलले मग…

संदीप शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरुन घरुन निघाला. कसबा सांगाव येथील दूधगंगा डाव्या कालव्याजवळ येताच त्याने पत्नी आणि दोन मुलांना कालव्यात ढकलले.

असे काय घडले की सुखी संसाराचा कालव्यात अंत झाला, पती आणि मुलांना कालव्यात ढकलले मग...
तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटकImage Credit source: Google
| Updated on: Feb 25, 2023 | 9:56 AM
Share

कोल्हापूर /भूषण पाटील : कौटुंबिक कलहातून पत्नीसह मुलांना कालव्यात ढकलून स्वतःही जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. कागलमधील कसबा सांगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत सुदैवाने 13 वर्षाची मुलगी बचावली आहे. मयत कुटुंबीय करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे रहिवासी आहेत. संदीप पाटील, राजश्री पाटील आणि सन्मित पाटील अशी मयतांची नावे आहेत. संदीप पाटील यांनी कुटुंबाला कालव्यात ढकलून देत स्वतःही जीवन संपवले.

पाहुण्यांकडे जाण्यासाठी घरुन कुटुंबासह निघाला पण…

संदीप पाटील हे साऊंड सिस्टीमच्या व्यवसायासोबत शेतीही करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. संदीप शुक्रवारी सकाळी पाहुण्यांकडे जाण्यासाठी पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरुन घरुन निघाला. कसबा सांगाव येथील दूधगंगा डाव्या कालव्याजवळ येताच त्याने पत्नी आणि दोन मुलांना कालव्यात ढकलले. यानंतर स्वतः निपाणी तालुक्यातील भोज येथे जाऊन जीवन संपवले.

सुदैवाने मुलगी बचावली

यात सुदैवाने बचावलेली मुलगी दुपारच्या सुमारास कालव्याच्या कठड्यावर रडत मदतीची याचना करत असल्याचे काही लोकांनी पाहिले. नागरिकांनी तिला बाहेर काढले. यानंतर कागल पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार कागल पोलिसांनी मृतदेहांचा शोध घेतला असता कालव्यात आई आणि मुलाचे मृतदेह सापडले. यानंतर संदीपचा शोध घेण्यात आला.

मुलीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु

शोध घेत असतानाच संदीपने भोज येथे आत्महत्या केल्याचे कळले. या घटनेत बचावलेल्या मुलीच्या डोक्याला मार लागला आहे. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कागल पोलिसात हत्या आणि आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संदीपने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले हे अद्याप कळू शकले नाही. कागल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.