AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी

या घटनेत एका निष्पाप मुलाता दुर्दैवी (Child Death) अंत झाला आहे. तर याच मुलाच्या घरातील एतर चार जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या मुलाचा जीव गेला असल्याचा आरोप करण्यात येते आहेत.

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी
कांदिवलीत इमारतीचा भाग कोसळलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 6:18 PM
Share

मुंबई : कांदिवलीतून एक हृदयद्रावक  (Kandivli Home Collapse) घटना समोर आली आहे. या घटनेत एका निष्पाप मुलाता दुर्दैवी (Child Death) अंत झाला आहे. तर याच मुलाच्या घरातील एतर चार जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या मुलाचा जीव गेला असल्याचा आरोप करण्यात येते आहेत. एका चाळीतील (Chawl) घर कोसळलं. घर कोसळण्याची घटन घडली, त्यावेळी घरातील लोक आतमध्येच दबली गेली. दोन महिला, दोन लहान मुलं आणि आणखी एक मुलगा यावेळी घरातच होते. घर कोसळल्यामुळे या सगळ्यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली. यात एका मुलाला जबर मार लागल्यानं त्याची प्रकृती सुरुवातीपासून चिंताजनक असल्याचं समोर येत होतं. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या दुर्दैवी घटने, या मुलाचा प्राण गेलाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, इतर चार जणही जखमी असून त्यांनाही नजीकच्या रुग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं घर पडलं कशामुळे?

कांदिवली पश्चिमेला ही घटना घडली. कांदिवली पश्चिमेच्या इस्लाम कंपाऊंड परिसरातील उत्तर भारतीय सेवा संघातील चाळी वन प्लस वन केलेलं घर कोसळलं. ज्या ठिकाणी हे घर आहे, त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं गटार तयार करण्यासाठी खोदकाम सुरु होतं. त्यादरम्यान, ही दर्दैवी घटना घडली. घर कोसळल्यानं घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडला होती. दरम्यान, यानंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. सध्या कांदिवली पोलीस या संपूर्ण प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी ढिगारा हटवण्याचे काम सुरू केलं होतं.

बीएमसीवर आरोप

या भागातील स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी बीएमसीला या घटनेला जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केला आहे. बीएमसीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप कमलेश यांनी केलाय. दरम्यान, घर कोसळल्यामुळे कांदिवलीतील चाळीत राहणारं अख्ख कुटुंब आणि त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी बीएमसी कंत्राटदाराला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर आता काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

डबल मर्डरने जळगाव हादरलं, मरणारे दोन्ही तरूण, नेमकं घडलं काय?

Pune Crime| पुण्यात चोरट्यांचा प्रताप..सराफाच्या दुकानाशेजारी दुकान घेतले अन भिंतीला भगदाड पडत लांबवले किलोभर सोने

Crime : दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा, 20 यांत्रिकी बोटींसह 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.